पूजा
श्रावण संपला , महालक्ष्मी , गणपती सगळं आटोपल ......आज शांत बसले असतांना सहज विचार आला मनात , पूज्य भावनेने केली जाते ती पूजा , बरोबर ? तरीही .........आपण कुठलीही पूजा का करतो ? गणपती . , सत्यनारायण असो किंवा ऑफिस मधली दिवाळीतली लक्ष्मीपूजा असो ........एक get together करायचं म्हणून ...... पूजा करायची परंपरा आहे म्हणून ..... सगळेच करतात म्हणून ..... पूजा केल्याने आपल्याला देव प्रसन्न होईल म्हणून ....... आपल्या आयुष्यातली संकट संपावीत म्हणून .........सगळ्या समस्यांवर उपाय सुचेल , किंवा सापडेल म्हणून......संकट , समस्या येऊच नयेत म्हणून .........की अजून काही .
पूर्वीच्या आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी .......मग तो कुठलाही धर्म असो .......ती का सुरु केली असावी ........पूजेला , प्रार्थनेला वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नाव आहेत .....अस असलं तरी
नीट जर पाहिलं तर सगळ्या पूजा , प्रार्थना या थोड्याफार फरकाने सारख्या आहेत .
पहिली समानता म्हणजे कुठल्याही धर्मात पूजा किंवा प्रार्थना करतांना सजावट करतात ......कुठे फुलांची , पानांची तर कुठे दिव्यांची , कुठे मेणबत्ती तर कुठे रंगीत सुंदर तलम झालर असलेल्या कापडाची तर कुठे अजून कशाची .
दुसरी अजून एक समान बाब म्हणजे कुठलीही पूजा करतांना गाणी म्हंटतात . त्या त्या धर्मात त्या त्या धर्माच्या संतांनी शब्दबद्ध केलेली गाणी . ज्यांना कुणी स्तोत्र मंत्र म्हणत कुणी नमाज , तर कुणी नुसतं प्रार्थना , carol तर कुणी अजून काही . शीख , इसाई , मुस्लिम लोकांमध्ये तर वेळेनुसार प्रार्थनेला नाव सुद्धा वेगळी आहेत . एक मात्र नक्की की कुठल्याही धर्मात कुठल्याही वेळी प्रार्थना , पूजा करतांना काहीतरी म्हणतच ती करतात .
पूजा कशी करावी हे सांगण्या करता गुरुजी , मौलवी , फादर , भन्ते असे धर्मगुरू असतात . ते सांगतील तशी पूजा केली जाते . हे अजून एक साम्य .
या मागे नक्की असे प्रयोजन काय असावे .
घरी रोज जी पूजा , प्रार्थना केली जाते त्यातही हे सगळं जमेल तसं केलं जातं , फक्त ते आपण एकटे करतो , कधी कामाला जायचं असल्याने वेळ कमी असतो आणि प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत त्या व्यक्तीला असलेल्या वेळेनुसार , वयानुसार , त्या त्या व्यक्तीच्या समजुतीनुसार आणि विश्वासाप्रमाणे बदलत जाते .
लहानपणी आई बाबांनी जे कर म्हंटलं ते केलं जातं.........नंतर हळूहळू ती व्यक्ती स्वतःला जमेल आणि पटेल तसे त्यात बदल करते ......कोणी घरी 5 , 10 , 15 मिनटं , 1/2 तास बसून पूजा , प्रार्थना करेल तर कुणी रोज देवळात चर्च, मस्जिद , गुरुद्वारा त जाईल . कुणी नुसता नमस्कार करेल , तर कुणी दिवा लावेल , कुणी आरती करेल, कुणी फक्त फुल वाहील तर कुणी अजून काही.......कुणी नमस्कार खूप वेळ करेल तर कुणी पटकन एखादा salute मारल्यासारखा , कुणी साष्टांग नमस्कार , कुणी शांतपणे त्या वास्तूत डोळे बंद करून ध्यान करत बसेल . याचाच अर्थ पूजा कशी ,कधी, केव्हा , कितीवेळ , कितीवेळा , कुठे करायची हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे , तरी हा प्रश्न उरतोच की हे का सुरु झालं असावं .
पूजा मोठ्या प्रमाणात करतांना नातेवाईक , शेजारी लोकांना बोलावलं जात त्यामागे घरातील लहान मोठ्या सर्वांनी एकत्र यावं , आजूबाजूच्या लोकांबरोबर संपर्क वाढवा , मैत्री व्हावी हा हेतू आहे असं जरी मानलं तरी तो तेवढाच होता का ?
पूजा , प्रार्थना करतांना मग ती कुठल्याही धर्माची असो ......त्यात तुम्ही मानता त्या देवाच , गुरूंच , त्या शक्तीच स्मरण करणं हे अपेक्षित असतं . हिंदु धर्मात देवाला निर्गुण , निराकार संबोधलं गेलं आहे तरी देवांना नाव आहेत निरनिराळी , समोर मूर्ती किंवा नाव असेल तर स्मरण करणं सोपं जातं म्हणून असेल कदाचित . कुणी त्याला ईश म्हणेल , कुणी अल्ला , कुणी वाहे गुरू तर कुणी अजून काही . आपल्याला कुणाची आठवण ही तर अशीच नाव ऐकल की येते न .
डोळे बंद करणं हे मन एकाग्र करण्यासाठी असावं . लक्ष विचलित झालं तर स्मरण करणं कठीण जातं . हे सगळं जरी केलं तरी आपले कान , ते ही तर लक्ष विचलित करतात , तसच आजूबाजूला चाललेली चर्चा ......अगदी कुठेतरी दूर रेल्वे ची होणारी announcement सुद्धा ऐकू येते आपल्याला शांत पहाटे.....म्हणूनच कदाचित हा स्तोत्र , गाणी म्हणण्याचा उपाय तर नसेल त्यावरचा ?
अजून थोडा विचार केला तर असं लक्षात येत की साधं झाडाची फुल गोळा करतांना , दुर्वा तोडतांना दुसरा कुठलाच विचार ती व्यक्ती त्यावेळी करत नसते ......गम्मत म्हणजे एखादे आजोबा किंवा आजी जेव्हा फुल तोडतात तेव्हा ते कधी कधी एखाद्या दगडावर चढून किंवा भिंतीवरून वाकून त्या फुला पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात स्वतःच वय विसरून . सजावट करतांना , फुल रचून ठेवतांना , रांगोळी काढतांना , फुलांचा हार करतांना किंवा अजून कुठल्याही प्रकारची सजावट करतांना एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो .
आपण नेहमी पाहतो पूजा , प्रार्थना खूप प्रकारचे लोक तर करतातच पण खूप प्रकारांनी ही ती केल्या जाते .
एकाच घरात , देवळात किंवा अजून कुठे .........एका पेक्षा जास्त लोकांनी एका वेळी प्रार्थना , पूजा जरी केली तरीही प्रत्येकाला आलेले अनुभव , अगदी सारख्या प्रकारच्या समस्यांवर सुचलेले उपाय हे ही वेगवेगळे असतात. ते कसे आणि का ?
प्रार्थना करतांना काही स्तोत्र , गाणी किंवा अजून काही लयीत म्हणतांना किंवा कुणी म्हंटलेलं ऐकतांना , एकट्याने अथवा सामूहिक पूजा करतांना मन एकाग्र होत , शांत वाटतं , त्यावेळेपुरत का होईना पण कुठेतरी आतपर्यंत मनातली खळबळ शांत झाल्यासारखं वाटतं . कधी कधी आधी कधी न सुचलेला विचार मनात येऊन मनाला सुखावून जातो . स्वतःच मन शांत करणं हा तर पूजा , प्रार्थना करण्यामागचा हेतू नसेल ?
तरीही अजून एक विचार मनात येतोय .....
अस म्हणतात , जस जेवण तसे विचार . तसंच आपण आजपर्यंत खूपदा वाचलंय जसे विचार असतील , जशी संगत असेल तस आयुष्यात घडतं , विचार चांगले असण्यासाठी चांगलं वाचन , संगत , आचरण , जेवण हे आचरणात आणलं तर चांगली कृती करण्याकडे त्या व्यक्तीचा मानसिक कल असेल आणि जर वाईट विचार केले , वाईट संगतीत राहील तर तशी कृती करण्याकडे त्या व्यक्तीच्या मनाचा कल राहिल . बरोबर ? तर मग वाईट विचार करणारे , वाईट संगतीत असणारे , वाईट कर्म करणारे , हेही तर पूजा करतात . ते का ?
अस म्हणतात शांत मनाने घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत , ते वाईट असोत अथवा चांगले .
ते कसे असावेत आणि का ? हा अजून एक चर्चेचा विषय आहे , असो .
पूजा, प्रार्थना करण्यामागे मन सबळ करणं , शांत, एकाग्र करणं हा विचार जर असेल कदाचित. मन सहजपणे एकाग्र , शांत होत नाही . त्यासाठी सजावटी पासून ते खूप जणांनी मिळून एकत्र प्रार्थना करण्याचे विविध उपाय तर सुरू झाले नसतील ? आज पर्यंतच्या झालेल्या संशोधनात मनाच्या वेगापेक्षा कशाचाही वेग जास्त आढळलेला नाही .........मनाच्या वारूला आवरण्याचा , त्याला नियंत्रणात ठेवण्याचा किंवा काही वेळा त्याला अनिर्बंध करून हवे तसे धावू देण्याचा अथवा शांत करण्याचा , समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर पूजा प्रार्थना करणं सुरु झालं नसेल ?
काय वाटतं तुम्हाला ?
श्रावण संपला , महालक्ष्मी , गणपती सगळं आटोपल ......आज शांत बसले असतांना सहज विचार आला मनात , पूज्य भावनेने केली जाते ती पूजा , बरोबर ? तरीही .........आपण कुठलीही पूजा का करतो ? गणपती . , सत्यनारायण असो किंवा ऑफिस मधली दिवाळीतली लक्ष्मीपूजा असो ........एक get together करायचं म्हणून ...... पूजा करायची परंपरा आहे म्हणून ..... सगळेच करतात म्हणून ..... पूजा केल्याने आपल्याला देव प्रसन्न होईल म्हणून ....... आपल्या आयुष्यातली संकट संपावीत म्हणून .........सगळ्या समस्यांवर उपाय सुचेल , किंवा सापडेल म्हणून......संकट , समस्या येऊच नयेत म्हणून .........की अजून काही .
पूर्वीच्या आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी .......मग तो कुठलाही धर्म असो .......ती का सुरु केली असावी ........पूजेला , प्रार्थनेला वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नाव आहेत .....अस असलं तरी
नीट जर पाहिलं तर सगळ्या पूजा , प्रार्थना या थोड्याफार फरकाने सारख्या आहेत .
पहिली समानता म्हणजे कुठल्याही धर्मात पूजा किंवा प्रार्थना करतांना सजावट करतात ......कुठे फुलांची , पानांची तर कुठे दिव्यांची , कुठे मेणबत्ती तर कुठे रंगीत सुंदर तलम झालर असलेल्या कापडाची तर कुठे अजून कशाची .
दुसरी अजून एक समान बाब म्हणजे कुठलीही पूजा करतांना गाणी म्हंटतात . त्या त्या धर्मात त्या त्या धर्माच्या संतांनी शब्दबद्ध केलेली गाणी . ज्यांना कुणी स्तोत्र मंत्र म्हणत कुणी नमाज , तर कुणी नुसतं प्रार्थना , carol तर कुणी अजून काही . शीख , इसाई , मुस्लिम लोकांमध्ये तर वेळेनुसार प्रार्थनेला नाव सुद्धा वेगळी आहेत . एक मात्र नक्की की कुठल्याही धर्मात कुठल्याही वेळी प्रार्थना , पूजा करतांना काहीतरी म्हणतच ती करतात .
पूजा कशी करावी हे सांगण्या करता गुरुजी , मौलवी , फादर , भन्ते असे धर्मगुरू असतात . ते सांगतील तशी पूजा केली जाते . हे अजून एक साम्य .
या मागे नक्की असे प्रयोजन काय असावे .
घरी रोज जी पूजा , प्रार्थना केली जाते त्यातही हे सगळं जमेल तसं केलं जातं , फक्त ते आपण एकटे करतो , कधी कामाला जायचं असल्याने वेळ कमी असतो आणि प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत त्या व्यक्तीला असलेल्या वेळेनुसार , वयानुसार , त्या त्या व्यक्तीच्या समजुतीनुसार आणि विश्वासाप्रमाणे बदलत जाते .
लहानपणी आई बाबांनी जे कर म्हंटलं ते केलं जातं.........नंतर हळूहळू ती व्यक्ती स्वतःला जमेल आणि पटेल तसे त्यात बदल करते ......कोणी घरी 5 , 10 , 15 मिनटं , 1/2 तास बसून पूजा , प्रार्थना करेल तर कुणी रोज देवळात चर्च, मस्जिद , गुरुद्वारा त जाईल . कुणी नुसता नमस्कार करेल , तर कुणी दिवा लावेल , कुणी आरती करेल, कुणी फक्त फुल वाहील तर कुणी अजून काही.......कुणी नमस्कार खूप वेळ करेल तर कुणी पटकन एखादा salute मारल्यासारखा , कुणी साष्टांग नमस्कार , कुणी शांतपणे त्या वास्तूत डोळे बंद करून ध्यान करत बसेल . याचाच अर्थ पूजा कशी ,कधी, केव्हा , कितीवेळ , कितीवेळा , कुठे करायची हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे , तरी हा प्रश्न उरतोच की हे का सुरु झालं असावं .
पूजा मोठ्या प्रमाणात करतांना नातेवाईक , शेजारी लोकांना बोलावलं जात त्यामागे घरातील लहान मोठ्या सर्वांनी एकत्र यावं , आजूबाजूच्या लोकांबरोबर संपर्क वाढवा , मैत्री व्हावी हा हेतू आहे असं जरी मानलं तरी तो तेवढाच होता का ?
पूजा , प्रार्थना करतांना मग ती कुठल्याही धर्माची असो ......त्यात तुम्ही मानता त्या देवाच , गुरूंच , त्या शक्तीच स्मरण करणं हे अपेक्षित असतं . हिंदु धर्मात देवाला निर्गुण , निराकार संबोधलं गेलं आहे तरी देवांना नाव आहेत निरनिराळी , समोर मूर्ती किंवा नाव असेल तर स्मरण करणं सोपं जातं म्हणून असेल कदाचित . कुणी त्याला ईश म्हणेल , कुणी अल्ला , कुणी वाहे गुरू तर कुणी अजून काही . आपल्याला कुणाची आठवण ही तर अशीच नाव ऐकल की येते न .
डोळे बंद करणं हे मन एकाग्र करण्यासाठी असावं . लक्ष विचलित झालं तर स्मरण करणं कठीण जातं . हे सगळं जरी केलं तरी आपले कान , ते ही तर लक्ष विचलित करतात , तसच आजूबाजूला चाललेली चर्चा ......अगदी कुठेतरी दूर रेल्वे ची होणारी announcement सुद्धा ऐकू येते आपल्याला शांत पहाटे.....म्हणूनच कदाचित हा स्तोत्र , गाणी म्हणण्याचा उपाय तर नसेल त्यावरचा ?
अजून थोडा विचार केला तर असं लक्षात येत की साधं झाडाची फुल गोळा करतांना , दुर्वा तोडतांना दुसरा कुठलाच विचार ती व्यक्ती त्यावेळी करत नसते ......गम्मत म्हणजे एखादे आजोबा किंवा आजी जेव्हा फुल तोडतात तेव्हा ते कधी कधी एखाद्या दगडावर चढून किंवा भिंतीवरून वाकून त्या फुला पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात स्वतःच वय विसरून . सजावट करतांना , फुल रचून ठेवतांना , रांगोळी काढतांना , फुलांचा हार करतांना किंवा अजून कुठल्याही प्रकारची सजावट करतांना एक प्रकारचा सात्विक आनंद मिळतो .
आपण नेहमी पाहतो पूजा , प्रार्थना खूप प्रकारचे लोक तर करतातच पण खूप प्रकारांनी ही ती केल्या जाते .
एकाच घरात , देवळात किंवा अजून कुठे .........एका पेक्षा जास्त लोकांनी एका वेळी प्रार्थना , पूजा जरी केली तरीही प्रत्येकाला आलेले अनुभव , अगदी सारख्या प्रकारच्या समस्यांवर सुचलेले उपाय हे ही वेगवेगळे असतात. ते कसे आणि का ?
प्रार्थना करतांना काही स्तोत्र , गाणी किंवा अजून काही लयीत म्हणतांना किंवा कुणी म्हंटलेलं ऐकतांना , एकट्याने अथवा सामूहिक पूजा करतांना मन एकाग्र होत , शांत वाटतं , त्यावेळेपुरत का होईना पण कुठेतरी आतपर्यंत मनातली खळबळ शांत झाल्यासारखं वाटतं . कधी कधी आधी कधी न सुचलेला विचार मनात येऊन मनाला सुखावून जातो . स्वतःच मन शांत करणं हा तर पूजा , प्रार्थना करण्यामागचा हेतू नसेल ?
तरीही अजून एक विचार मनात येतोय .....
अस म्हणतात , जस जेवण तसे विचार . तसंच आपण आजपर्यंत खूपदा वाचलंय जसे विचार असतील , जशी संगत असेल तस आयुष्यात घडतं , विचार चांगले असण्यासाठी चांगलं वाचन , संगत , आचरण , जेवण हे आचरणात आणलं तर चांगली कृती करण्याकडे त्या व्यक्तीचा मानसिक कल असेल आणि जर वाईट विचार केले , वाईट संगतीत राहील तर तशी कृती करण्याकडे त्या व्यक्तीच्या मनाचा कल राहिल . बरोबर ? तर मग वाईट विचार करणारे , वाईट संगतीत असणारे , वाईट कर्म करणारे , हेही तर पूजा करतात . ते का ?
अस म्हणतात शांत मनाने घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत , ते वाईट असोत अथवा चांगले .
ते कसे असावेत आणि का ? हा अजून एक चर्चेचा विषय आहे , असो .
पूजा, प्रार्थना करण्यामागे मन सबळ करणं , शांत, एकाग्र करणं हा विचार जर असेल कदाचित. मन सहजपणे एकाग्र , शांत होत नाही . त्यासाठी सजावटी पासून ते खूप जणांनी मिळून एकत्र प्रार्थना करण्याचे विविध उपाय तर सुरू झाले नसतील ? आज पर्यंतच्या झालेल्या संशोधनात मनाच्या वेगापेक्षा कशाचाही वेग जास्त आढळलेला नाही .........मनाच्या वारूला आवरण्याचा , त्याला नियंत्रणात ठेवण्याचा किंवा काही वेळा त्याला अनिर्बंध करून हवे तसे धावू देण्याचा अथवा शांत करण्याचा , समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर पूजा प्रार्थना करणं सुरु झालं नसेल ?
काय वाटतं तुम्हाला ?
तुझी अक्षर पूजा खरीच स्तुत्य ।
ReplyDeleteमनातील विचाराना शब्दात सजवायचे , आळवायचे अन छान आरास करून मांडायचे .खुप सुंदर...
धन्यवाद , छान अभिप्राय दिलास
Delete👌👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete🙏🙂
DeleteKhupach sundar paddhatine prarthaneche prakar mandalet .
ReplyDeleteधन्यवाद ,🙂
Deleteछान लिहिले आहे. पूजा अर्चना करण्याने मन सुखावत हे मात्र अगदी खर आहे.
ReplyDeleteखरंय , धन्यवाद 🙏🙂
DeleteSundar
ReplyDeleteधन्यवाद,🙂
DeleteSundar
ReplyDeleteधन्यवाद🙂
Delete👌👌👍👍
ReplyDeleteAplya manacha samtol rakhnyasathi pooja suru keli asawi asa mala watata.
ReplyDeleteAplya manacha samtol rakhnyasathi pooja suru keli asawi asa mala watata.
ReplyDeleteho , hehi ek karan asava 🙂
Deleteखुप छान लेख 👌👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद ☺️
DeleteNobody understands the truth that you yourself is the part (ansh) God. So everyone try to get peace by doing Puja. I think so
ReplyDeleteSo true ☺️
Delete