Followers

Wednesday, 26 June 2019

पहाड

पहाड

पहाड म्हंटलं की डोळ्यासमोर येतो सुंदर हिरवळ असलेला मोठ्ठा डोंगर ........तसंच पहाड म्हंटल की नदी तर येणारच ......आणि सूर्योदय तसंच सूर्यास्त सुद्धा.......

लहानपणी हंमखास हे चित्र सगळ्यांनी काढलं असेल ........

एक मोठ्ठा पहाड ......त्याला  तांबडा रंग द्यायचा........त्यातून डोकावणारा अर्धा सूर्य .........कधी कधी त्याला नाक डोळे पण असायचे बरं .........पहाडाच्या पायथ्याशी वाहणारी नदी ......ती निळी .......आजूबाजूला हिरवं गवत .....1 द दुसरं झाड .....ते पण नारळाचं आणि एक कौलारू झोपडी ......त्याला 1 दार आणि एक खिडकी........घराला पायवाट ...... थोडी झुडूप.....त्यावर छोटी रंगीत फुलं ........काय ......आठवलं नं .......हे चित्र प्रत्येकाच्या मनात कसं छापलेलं आहे ........

पहाड म्हंटल की हे जसं आठवतं तसचं मोठ्ठ काहीतरी हे पण मनात येतं .....मग ते काहीही असो .........

पहाडासारखा माणूस म्हंटल की डोळयांसमोर येतं ते धिप्पाड व्यक्तिमत्व ........

पहाडासारखा आवाज म्हंटला.........की काही जणांना आठवेल त्यांच्या बाबांचा , कुण्या काकांचा आवाज.......... जो ऐकल्यावर कदाचित लहानपणी भीती वाटली असेल आणि मग  काही काळानंतर त्या व्यक्तीला ओळखायला लागल्यावर आदर सुद्धा..................

अशा आवाजाची जशी जरब असते तसंच तो आवाज ऐकायला पण आवडतो बरं .........जसं शास्त्रीय संगीत गाणाऱ्याचा आवाज जर पहाडीअसेल तर तो मधुर जरी नसला तरी ऐकावासा वाटतो .....त्यात तल्लीन होतो आपण ..........आणि तो पहाडी आवाज  जर भीमसेन जोशींचा असेल  तर......त्यांची गायलेली भक्तिसंगीत ही लहानपणापासून सगळ्यांनीच ऐकली आहेत .......ती दुसऱ्या कुणी गायली तर मनाला तेवढी भावत नाहीत .....हो नं ......

पहाडी आवाज हा तसा पुरुषांचा जास्त प्रमाणात असतो पण पहाडी आवाजात काही स्त्रियांनी गायलेली   गाणी पण खूप लोकप्रिय आहेत ........... इला अरुण , उषा  उत्तुप , यांची गाणी ......

असेच अजून कितीतरी गायक आहेत .......पण त्यावर लिहीलं तर विषयांतर होईल ..........

पहाडासारखा आधार म्हंटला की कोणी आपल्या जवळच्या व्यक्ती चा आपल्याला अगदी नेहमी .........आणि  कुठल्याही परिस्थितीत  मिळणारा भक्कम आधार......

आधार जो देतो त्याला या गोष्टींची तेवढी जाणीव नसते ......कदाचित ती व्यक्ती ते स्वतःच कर्तव्य म्हणून करत असते.......पण जी व्यक्ती तो आधार घेत असते तिला तो आधार नेहमी जाणवत असतो ................कधी तो व्यक्त केल्या जातो तर कधी गृहीत धरल्या जातो .......काही वेळा मात्र तो गमावल्या नंतर त्याची जाणीव होते .......असो .....

लहानपणी एक खेळ खेळतात सगळी मुलं ,...........

नदी कि पहाड .....आठवलं ......

या खेळात........ ज्याच्यावर राज्य आहे ....... ती व्यक्ती नदीत उभी असते आणि जी कोणी व्यक्ती  नदीत असेल तिला out करू शकते पण एकदा का दुसरी व्यक्ती पहाडावर चढली की मग मात्र ती तसं करू शकत नाही.......

हे खेळातून दिलेलं ज्ञान तर नसेल ........जो पर्यंत वाहत्या प्रवाहात ......मग तो प्रवाह कुठलाही असो ......आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर  असो ........जो पर्यंत ती व्यक्ती भक्कम असा आधार , किंवा पक्का असा निर्धार करत नाही तोपर्यंत ती या आयुष्याच्या खेळातून बाद होऊ शकते ......म्हणजे मनाने खचू शकते किंवा तिला कुणी अडवू शकतं किंवा त्या मार्गाने जाण्यापासून परावृत्त करू शकतं .......पण एकदा का ती पहाडावर चढली ........तिने पक्का निर्धार केला .........की मग मात्र तीला कुणी काही करू शकत नाही ........ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही ..........मार्गात अडथळे आणू शकत नाही .......ती आयुष्याच्या या पहाडावरून त्या पहाडावर सहज रित्या प्रवास करत  जाते आणि यशस्वी होते........... बाद होत नाही ......कधी येतो एखादा असाही प्रवाह आयुष्यात की त्यात ती out होते पण परत प्रयत्न करून ती पहाडावर चढू शकते ............आयुष्याचा नदी की पहाड खेळ सुरूच राहतो .......

असा तर अर्थ नसेल .....?