Followers

Thursday, 30 July 2020

मैत्री

मैत्री

Friendship is a sweet responsibility , never an opportunity .........

असं Khalil Gibran नी म्हटलंय

पूर्वी आपल्याला सगळ्यांना मित्र तर होते पण असा freindship डे साजरा करतात हे मात्र माहिती नव्हतं .....आजकाल सगळे अगदी शाळेतल्या मुलांपासून ते आजोबा आज्जी पर्यंत सगळे फ़्रेंडशिप डे celebrate करायला लागले .......हो न

मैत्री म्हंटली की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती शाळेतली मैत्री ......घराच्या आजूबाजूला राहणारे आपले मित्र मैत्रिणी .........त्यावेळी सगळ्यांनी मिळून केलेली मजा आणि कधी कधी त्यासाठी एकत्र भोगलेली किंवा कुणासाठी तरी आपल्याला मिळालेली सजा पण .

मजा असते नं त्या मैत्रीत .....त्यावेळी मैत्री फार पटकन होते .....अगदी काका मामा कुणाहीकडे गेल्यावर तिथे आजूबाजूला राहणाऱ्या मुलांबरोबर सुदधा मैत्री अशी
 यूsss होऊन जाते .......जसे जसे मोठे होतो आपण  .....कॉलेज मध्ये जातो ...... college मध्ये गेल्यावर मैत्री होते तरी तिथे भेटलेले मित्र मैत्रिणी यात थोडं अंतर असतं ......काही आपले शाळेतलेच मित्र असतात तर काही फक्त hi bye पुरते असतात तर काही हळूहळू जिवलग होतात.......काही नेहमी घरी येणारे तर काही फक्त college पुरते भेटणारे.......
त्यावेळी जर hostel मध्ये राहायची गरज पडली असेल तर तिथे झालेले मित्र , त्यांच्या बरोबर केलेली मस्ती , तिथल्या आठवणी हा  आयुष्यभरासाठी मिळालेला एक सुंदर ठेवा असतो ......मित्र देखील वेगवेगळे  असतात ........काहींनी आपल्याला अभ्यास करायला शिकवलं असतं तर काहींना आपण शिकवलं असत .... काहीं मित्रांनकडे पाहून कस वागायला नको हे आपण शिकलो असतो ......काही मित्रांबरोबर मस्ती मजा केल्या जाते तर काहींची मजाही घेतल्या जाते



त्यानंतर येतो तो नवीन नोकरीचा काळ .......कधी त्यात जुने मित्र भेटतात तर कधी पूर्ण नवीन वातावरणात अजून नवीन मित्र तयार होतात ........

वयाच्या या टप्प्यावर मात्र मैत्री पटकन होत नाही ......कुठेतरी जुन्या मैत्रीचा पगडा असतो आपल्यावर आणि खूपदा काही वेगळे अनुभव पण यायला सुरुवात झाली असते त्यामुळे पटकन कुणावर विश्वास ठेवल्या जात नाही .
एक नाव दिलं जातं या नात्याला .........सहकारी .....मित्र म्हणायला थोडं अवघड जातं .......सहकारी म्हंटल की कसं........ थोडं अंतर ठेवल्या जातं आणि आपल्या मित्रांकडून ज्या अपेक्षा असतात निर्भेळ मैत्रीच्या ......त्याही ठेवल्या जात नाही आणि मग अपेक्षाभंगही होत नाही .....ही मैत्री पुष्कळदा घट्ट होते .....मग सहकारी हे नाव मागे पडतं ......आजच्या या compitition च्या युगात हे थोडं कमी होतं ...... काही अपवाद असतात .......असो

मैत्री ही फक्त मित्रांबरोबर च असते का .......कि मैत्री या नात्याचा अर्थ अजून काही निराळा आहे .......म्हणजे बघा नं .......अगदी लहान असतांना मुलांचे मित्र हे त्यांचे आई बाबा असतात . भाऊ ,  बहिणी , आज्जी आजोबांशी ,आत्या , मावशी , काका , मामा बरोबर गट्टी असते .......जसे मुलं घराच्या बाहेर पडतात तसे मग मित्र या शब्दाची व्याख्या बदलत जाते .......किंबहुना खूपदा  घरातले ते आप्त आणि बाहेरचे मित्र असं काहीसं सांगितल्या जातं , शिकवल्या जातं किंवा कधी कधी ते आपोआप शिकल्या जातं ...... नंतर मात्र  ते मित्रच जास्त जवळचे होतात आणि त्यांच्याबरोबर जास्त वेळा सगळ्या गोष्टी share केल्या जातात  अगदी शाळेतल्या खाऊ च्या डब्ब्यापासून ते मनात छोट्या नवीन तयार झालेल्या गोड कोपऱ्या पर्यंत ...काय ? .....बरोबर नं  .........

जसे जसे मोठे होतो आपण ..... नोकरी करायला लागतो  , पुढच्या शिक्षणासाठी एकटे राहायला लागतो ...... शाळेतले मित्र हे फक्त फोनवर भेटणं सुरु होतं..... त्यावेळी परत आपण आपल्या लहानपणी च्या मित्रांना भेटणं कसं जमेल याच planning करू लागतो .........ज्या लग्न कार्यांना जातांना पूर्वी आई बाबा म्हणतात म्हणून जात असतो तिथे परत आपले आज्जी , आजोबा , मावशी ,  काका , मामा ,  बहीण ,  भाऊ भेटतील म्हणून जाऊ लागतो .......अर्थात कधी जाणं होतं .......कधी नाही ......पण मध्यंतरी शैक्षणिक काळात थोडे दूर गेलेले हे लहानपणीचे मित्र परत जवळ येतात .......जितकं महत्व शाळेतल्या , कॉलेज मधल्या get together ला दिल्या जात तेवढंच family get together ही दिल्या जातं ........शाळेतल्या कॉलेज मधल्या आठवणी आठवून एकमेकांना चिडवत परत कॉलेज life परत  अनुभवल्या जातं तसच  लहानपणीचे एक एक केलेले कारनामे , मस्ती सगळं आठवून लहानपण सुध्दा अनुभवल्या जातं .

आयुष्यात खरंच इतकेच मित्र असतात का आपले ........... कित्येक वर्षे रोज नेमाने newspaper देणारा , दूध आणून देणारा  , घरी पोळ्या करणारा किंवा करणारी, मुलांना शाळेत नित्यनेमाने पोहोचवणारा रिक्षावाला , माळी , घरकाम करणारी बाई इतकंच कशाला ज्या भाजीवाल्यांकडून आपण नेहमी भाजी घेतो ते , नेहमीच किराणा दुकान , आपले family doctor.......असे कितीतरी लोक ज्यांच्या शिवाय आपली रोजची काम होत नाहीत .......त्यांना काय नाव द्यायचं ......

तेही तर आपल्या आयुष्यात आनंद पेरत असतात ......आपल्याला आपलं घर नीट ठेवायला मदत करत असतात .......कधी बरं नसतांना ,  दुसरं कुणी जवळ नसतांना आपल्या जवळ थांबून सोबत करत असतात ..........या सगळ्या मध्ये पैश्यांची देवाणघेवाण जरी होत असली तरी देखील .....विचार करा .......आपण खूपदा हक्काने सांगतो नं त्यांना काम .......कधी पैसे नसले आपल्याकडे तरी ती वस्तू तो दुकानदार विश्वासाने आपल्याला देतो न .......कधी आपल्या घरी घडलेली आनंदाची गोष्ट देखील सांगतो आपण त्यांना .......पेढे देतो ......त्यांच्या बरोबर आपला आनंद वाटतो .......हो नं .......कधी त्यांच्या घरी काही problems असले तर ते पण आपल्याला सांगतात........आपल्यापरीने आपण त्यांना जमेल ती मदत करतो .......त्यांच्या घरच्या कार्यप्रसंगांना आवर्जून जातो ........त्यांनाही बोलावतो . इतकं सगळं करतो पण आपण त्यांना मित्र म्हणत नाही .......कुठेतरी थांबतो ......का ?.........

कदाचित जुन्या विचारांचा पगडा तर आपल्याला अडवत नाही ?



#friendshipday, #मैत्री,


Saturday, 25 July 2020

बंधन


बंधन

बंधन म्हंटल की बांधल्यासारखं वाटत न ....बंधन मग ते कुठलं का असेना .....बंधन खरंच चांगलं का वाईट ...... बंधनं खूप प्रकारची असतात ..... घरातल्या प्रत्येकावर कुठली न कुठली बंधन असतात ......मग ती कधी स्वतःहून ठरवून घेतलेली असतात तर कधी कुणी दुसऱ्याने सांगितलेली तर कधी कुणी लादलेली . साधंच पहा न ,  मुलांनी सात च्या आत घरात यायचं  बंधन . ते मुलांच्या चांगल्या साठी जरी असलं तरी त्यांना त्याचा जाच वाटतो कारण मित्रांबरोबर खेळणं किंवा गप्पा मारणं पूर्ण झालेलं नसत .  अर्थात लहानपणी खेळताना पूर्ण खेळणं झालं असं कधी वाटतच नाही आणि गप्पा तर कधी संपतच नाहीत . त्यामुळे मग आईबरोबर वाद होतो . ती पण तेवढीच खमकी असते आणि ते बंधन  ती पाळायलाच लावते .

समोर एखाद्या भांड्यात काही ठेवलेलं दिसत असेल तर त्यावर एखादी  नजर जाते पण त्याबद्दल फारसा विचार केल्या जात नाही .   तीच वस्तू जर झाकून ठेवली असेल तर मात्र त्यात काय आहे हे पाहण्याची इच्छा होते . एखाद्या घराची  कंपाऊंड wall उंच असेल तर आत कोण रहात ? इतकी उंच भिंत का बांधली असेल ? याबद्दल मनात कुतूहल निर्माण होतं . त्याचप्रमाणे एखादी गोष्ट का करायची नाही किंवा का करायची हे जर नीट समजावून सांगितलं तर ते बंधन न वाटता दुसऱ्यांनी आपली घेतलेली काळजी आहे असं त्या व्यक्तीला वाटत . हो न ? यासाठी  त्यांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर मात्र द्यावी लागतात . अर्थात मोठे झाल्यावर मुलांना त्याच महत्व पटत ही गोष्ट अलाहिदा .

बंधन ही फक्त लहान मुलांसाठीच असतात का ? ती तर मोठ्यांनाही असतात . समाजात वावरतांना कसं वागावं ?  कसं वागू नये ? कुठे काय बोलावं , कस बोलावं ,  कुठल्या समारंभाला  काय कपडे घालावेत ? इतकंच कशाला ,  कुठे कसं खावं ? हाताने जेवाव की काटे चमचे वापरून ? एक ना अनेक ........हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे न ?  अर्थात ते खूपदा स्वतःहून पाळलेले असल्यामुळे ते बंधन न वाटता आपण त्याला जीवनशैली म्हणतो इतकंच . हेच जर दुसऱ्या कुणी करायला सांगत असेल तर  मात्र ते  झुगारून द्यायची इच्छा होते .  बरोबर न ?

बंधनं फक्त जाचकच असत का ? उदाहरणार्थ  , रक्षाबंधन , मैत्रबंध  या शब्दात किती आपुलकी जाणवते .....प्रेमबंधन , रेशीमबंध म्हंटल की प्रेम , सामाजिक बंधन म्हंटल की जबाबदारीची जाणीव , काळाचे बंधन म्हंटले की यातून वेगवेगळ्या परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात ,  बरोबर न ? बंधनकारक या शब्दात मात्र जबरदस्तीची भावना जाणवते ..... बंधनात अडकण हे कधी चांगलं तर कधी नाही ......त्यात अडकून कधी त्रास होतो तर कधी आनंद मिळतो ....... ते बंधन नेमकं कशाचं आहे ......दुसऱ्या कुणी घातलं आहे की त्या व्यक्तीची  ते पाळायला संमती आहे यावरही हे अवलंबून असत .

बंधन  लोकांमध्ये असलेली ग्राह्य मर्यादा , सहशीलता ठरवते आणि मग कुठे आणि काय बंधन घालता येतील याचा अंदाज बांधते . बंधन घालणार कोणीही असो , आप्त , स्वकीय असोत नाहीतर कोणी परके किंवा अगदी सरकार सुद्धा . आपल्या कृतीवर घातलेली बंधन ही पुष्कळदा पाळावी लागतात . कधी ती अपरिहार्य असतात तर कधी आपल्याच भल्यासाठी असतात .

लोकं एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर जस बंधन घालू शकतात तसच एखादया व्यक्तीबरोबर बोलतांना त्या व्यक्तीच्या मनात स्वतः च्याच क्षमतेबद्दल , योग्यतेविषयी संदेह निर्माण करू शकतात . खरं तर हे त्यांच दुसऱ्या व्यक्तीबद्दल असणार वैयक्तिक मत असल तरीही कधी कधी ती व्यक्ती जे सांगतेय त्यावर ऐकणारी व्यक्ती विश्वास ठेवून त्या चौकटीत स्वतःला ठेऊनच स्वतःकडे पाहू लागते .  कुणी आपल्या कृतीवर घातलेले बंधन काही कारणास्तव मान्य करावे लागले तरी आपले विचार मात्र नेहमी स्वतंत्र असावेत . आपले असावेत .

थोडा अजून विचार केला तर लक्षात येत ,  बंधन म्हणजेच बंध , बंदी , निर्बंध ,  बांधिलकी , म्हणजेच मर्यादा , म्हणजेच restrictions म्हणजेच limits , curb , restraint , control , constraint , rein इत्यादी इत्यादी .  या सर्व शब्दांचा अर्थ थोडयाफार फरकाने सारखाच आहे , आहे न ?


अस म्हणतात  'self discipline is a form of restriction ' तसच हेही म्हणतात की  " All limits are self imposed " बरोबर न ?  मर्यादा  प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात . त्या स्वतःच स्वतःवर घातलेल्या असतात .  कुठल्या मर्यादांच पालन करावं ? कुठल्या नाही ? हादेखील एक वादातीत विषय आहे . ज्या भीतीला आपण सामोरे जात नाही त्या आपल्याच मर्यादा बनून जातात . होतं न अस ?  कुठलीही व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते , कुठपर्यंत जाऊ शकते , तिच्या शारीरिक , मानसिक , वैचारिक , आर्थिक मर्यादा काय आहेत हे त्या व्यक्तीने स्वतः  अभ्यासल्याशिवाय  कळत नाही .  कदाचित म्हणूनच , 

" Don't limit your challenges , challenge your limits " हे वाक्य मनाला  भावतं आणि आपलंसं करावस  वाटतं ?  तुमचं काय मत आहे ?






#challengelimits, 


Sunday, 19 July 2020

प्रश्न

प्रश्न


आता तुम्हाला वाटेल ,  प्रश्न हा काय विषय आहे ब्लॉग लिहीण्याचा ? खरतर आज प्रश्न पडला होता मला की लिहायला कुठला विषय निवडावा  ?  वाटलं प्रश्न पडणं हे तर ज्ञानवर्धनाच पहिलं पाऊल . पहिलं पाऊल पुढे पडलं की आपोआप दुसरं पडतच आणि मग ज्ञानवर्धनाकडे हळूहळू वाटचाल सुरू होते , बरोबर न . त्यामुळे आज म्हंटल करू या  आपणच आपलं ज्ञानवर्धन .

एक साधासा प्रश्नही कित्येक , अनेक  नवनवीन उत्तरे निर्माण करतो आणि त्यातूनंच मग पुन्हा अनेक वेगवेगळे प्रश्नही उभे रहातात.

प्रश्न का पडतात ? कुणाला पडतात ?  केव्हा पडतात ? हे प्रश्न जेव्हा मला पडले तेव्हा एक जुनं गाणं आठवलं ,

" ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? " इतकंच नाही तर प्रत्येक प्रश्न का पडतो याचे एक मजेदार उदाहरण ही आठवलं लगेच आणि आठवल्यावर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे असंही वाटल .

एकदा काय झालं आमच्या बाजूला राहणाऱ्या 2,3 वर्षाच्या छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता . आधी वाटलं काहीतरी हट्ट करत असेल पण ती सारखी काहीतरी सांगतेय अस वाटलं म्हणून पाहायला गेलो . ती रडत रडत सांगत होती की दुपारी तिनी बर्फ संपून जाईल . बाबांना मिळणार नाही या विचाराने दाराच्या मागे बाबांना ऑफिस मधून आल्यावर द्यायला वाटीत बर्फ लपवून ठेवला होता .  आता तो तिथे नाहीये . झालं असं की त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते . घरात  बर्फ सारखा सगळ्यांना हवा असायचा आणि त्यामुळे संपायचा  . आता त्या लपवून ठेवलेल्या वाटीतल्या  बर्फाच  झालं पाणी . तिची आई तिला हे सांगायचा आटोकाट प्रयत्न करत होती की अग बर्फाच पाणी झालं . बर्फ कसा राहील दिवसभर ?  आईच्या दृष्टीने ही साधी गोष्ट होती पण मुलीला  ते काही पटत नव्हतं . त्यामुळे हे असे प्रश्न  पडतात हे मला एकदम पटलं  ,  ये क्या हुआ ? कैसे हुआ ? गंमत अशी की तिच्या बालमनाला हे काही केल्या पटत नसल्याने  पुढचे प्रश्न तिला नक्की पडले असावेत , कब हुआ ? क्यू हुआ ? कारण मी तर इथे बर्फ ठेवला होता मग बर्फाच पाणी झालं केव्हा  ? आणि का ?  एकीकडे मजा वाटत होती तर दुसरीकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशी देताही येत नव्हती .

बर तिला म्हंटल " ओ छोडो , ये ना सोचो " तर नाही  , तिला तोच बर्फ हवा होता तिने वाटीत लपवून ठेवलेला . शेवटी मग तिला बोलण्यात गुंतवून त्या वाटीत चुपचाप  दुसरा बर्फ परत आणून  ठेवला ,  तर स्वारी एकदम खुश , सगळे प्रश्न गायब आणि मग एकदम " मै चली मै चली" .

हा प्रसंग आठवला की आठवतो तो निरागस भाव . त्या निरागस पणाने विचारलेले प्रश्न की ज्यांची उत्तर सगळ्या मोठ्यांकडे असूनही तिचे प्रश्न अनुत्तरित होते .

असेच कित्ती प्रश्न लहानपणी पडतात . जस sodawater च्या बॉटल मध्ये आधी सोडा घालतात की कंचा ? रेडिओ किंवा TV त गायक किंवा actor आत कसा आणि कुठून जातो ? सगळ्या वस्तुंना रंग असतो मग  पाण्याला रंग का नाही ? चंद्र , तारे रात्रीच का दिसतात ? आरशात आपल्या गालाची पापी का घेता येत नाही ?  इतके प्रश्न पडतात की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता आईबाबांची दमछाक होते . घरात आजी आजोबा असले की  ते मात्र अशा सगळ्या प्रश्नांना बरोबर हाताळतात .

आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी माणसे अनेक भेटतात पण आपण हा प्रश्न का विचारतोय यामागचं कारण समजणारी माणसे क्वचितच भेटतात .

अस म्हणतात ,

" A child is an island of curiosity surrounded by sea of questions "

खरंच , मूल हे कुतूहलाच एक बेट आहे ,  ज्या बेटाच्या चारही बाजूला प्रश्नांचा सागर आहे . किती समर्पक दिलेली उपमा आहे .

प्रश्न फक्त लहानपणी च पडतात का ?  ते तर मोठे झाल्यावरही  पडतात . ज्ञानवर्धन हे तर आयुष्यभर सुरूच असतं . नंतर   त्या प्रश्नांना आपण अडचणी , समस्या , संकट वगैरे वगैरे नावांनी  ओळखतो .

 लहानपणी प्रश्न मनात आल्याबरोबर  कुणालातरी  विचारून त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो , अगदी लगेच , ताबडतोब . जोपर्यंत प्रश्नाच उत्तर मिळत नाही किंवा शोधत नाही तोपर्यंत मुलांची जिज्ञासा त्यांना शांत बसू देत नाही .  मोठं झाल्यावर मात्र तस केलं जातं नाही . शक्यतोवर स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याकडे कल वाढलेला असतो . ते बरेचदा सोडवल्या जातातही . एखादेवेळी दुसऱ्या कुणाची मदत लागते . ती मदत कधी मिळते तर कधी मिळत नाही . कधी कधी ती मिळणारच नाही असं गृहीत धरून  मदत मागितल्या जात नाही .  कदाचित पूर्वी आलेले अनुभव त्या व्यक्तीला मदत मागण्यापासून परावृत्त करतात . काही प्रसंगी माणसाला फक्त सोबत हवी असते . तुझे प्रश्न तू सोडव म्हणण्यापेक्षा सगळे प्रश्न आपण सोडवू या शब्दांची गरज असते .


आयुष्यातल्या काही प्रश्नांची आवर्जून उत्तर शोधायचा प्रयत्न केला जातो तर काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केल्या जात नाही . कधी कधी उत्तर मिळाली तरी ती सांगितल्या जात नाहीत  तर काही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करते . अस कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं तर कधी आपल्या लोकांच्या काळजीने केलं जातं.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं  ?  का नसतं ? कदाचित असतंही आणि नसतंही . काही प्रश्नांच्या उत्तराने चांगला परिणाम साधण्याऐवजी जर वाईट परिणाम साध्य  होणार असेल तर ते टाळलेल केव्हाही चांगलं याकडे मोठ्या लोकांचा कल वाढलेला जाणवतो  .  काही अनुत्तरित प्रश्न हे काही वेळेला प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर देणाऱ्या  दोन्ही व्यक्तीचा मार्ग सुकर करतात म्हणूनही असेल कदाचित . 

प्रश्नांना उत्तरे ।
उत्तरांना कारणे ।
कारणांना विश्लेषणे ।
विश्लेषणांना संदर्भ  ।

खरं तर प्रवास , प्रश्न ते उत्तर एवढाच असतो
पण पुष्कळदा प्रश्न आणि संदर्भ यांची अशी काही गुरफट होते की पुन्हा उरतो तो प्रश्न च .


मागे एक गोष्ट वाचली होती मी .   बालकमंदिरात असतांना एका मुलीने सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी मुखोद्गत केली . आईने म्हंटल ,  मी तुला प्रश्न विचारते ,  तू उत्तर सांग. आपण उजळणी करू .  मुलगी म्हणाली , आई मला सगळं पाठ झालंय , आता नको न विचारू . मी लिहीन उद्या सगळं बरोब्बर . दुसऱ्या दिवशी पेपर हातात घेतल्यावर तिच्या लक्षात आलं , " अरे मला उत्तर तर सगळी पाठ  आहेत पण प्रश्न तर मी वाचलेच नव्हते . त्यामुळे कुठल्या प्रश्नाला काय उत्तर लिहायचं हे  माहितीच नाही ". याच काहीसं उलट  मोठं झाल्यावरही तर होतं न ? प्रश्न माहिती असतात . प्रश्नाकडे इतकं जास्त लक्ष दिलं जातं की उत्तर शोधायचा प्रयत्नच केल्या जात नाही . ये क्या हुआ ? कैसे हुआ ? कब हुआ ? क्यू हुआ ? यावरच सगळं लक्ष केंद्रित होतं . उत्तरच सुचत नाही . त्या ऐवजी जर  " वो छोडो , ये ना सोचो " अस म्हणून  उपाय शोधण्याचे प्रयत्न  लवकर सुरू केले  तर  प्रश्न, प्रश्न राहतच नाही .

कधी कधी मनात खळखळून वाहणाऱ्या प्रश्नांचा प्रवाह असह्य पेचात पाडणारा भासतो. जसा शांत दिसणाऱ्या पाण्याचा न दिसणारा तळ त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबच्या आड लपलेला असतो तशीच प्रश्नांची उत्तरही कुठेतरी त्या गोंधळलेल्या मनाच्या प्रतिबिंबा आडच दडलेली असतात .

कोणत्याही सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर " वेळ" हेच आहे .


❓उभा धरला तर प्रश्न दिसतो आणि तोच जर आडवा धरला तर किल्ली 🔑 .  त्याकडे कोण कस बघेल यावर हे अवलंबून असत .  प्रश्नातच उत्तर दडलेलं असत अस जे म्हणतात ते या वरूनच  कदाचित आलं असेल .
काय वाटतं तुम्हाला  ?




#कुतुहल, #जिज्ञासा, 

Saturday, 11 July 2020

संगीत

संगीत



संगीत हा शब्द ऐकला की बहुतेक सगळ्यांना गाण्याची आठवण येते बरोबर न . संगीत आणि गाणं हे एकमेकांचे अभिन्न अंग आहेत . संगीताशिवाय गाणं आपण ऐकतो किंवा गाण्याशिवाय संगीतही. तरीही आपल्या मनात ते इतके खोलवर रुजले आहेत की त्यांचा वेगवेगळा विचारच केल्या जात नाही .  संगीताने  गाण्याची आणि गाण्यामुळे संगीताची लज्जत अजूनच वाढते हेही तेवढंच खरं .



लहानपणी कुणी तरी माझी फिरकी घेत सांगितलं होतं मला की chinese मुलांच्या बारशाच्या वेळी नाव ठरवतांना एखाद्या उंच ठिकाणावरून  काचेची किंवा चिनीमातीची भांडी ,  कप  ,  प्लेट्स खाली पाडतात आणि जो आवाज येईल ते नाव ठेवतात बाळाचं . तेव्हा गंमत वाटायची , वाटायचं कधी तरी आपणही पाडून बघावा वरून एखादा glass किंवा कप खाली , कसा आवाज येतो पाहायला पण ती हिम्मत कधी झाली नाही . 



कप , ग्लास यावर टिचकी मारून आवाज कसा येतो हे पाहायचा प्रयत्न केला . दोन कप किंवा ग्लास , साधे स्टील चे रोजचे वाट्या चमचे , छोट्या ताटल्या आणि चमचे , कप आणि चमचा असे सगळे काही प्रयोग झाले .  ठराविक लयीत वाजवल्यावर त्यातून निर्माण होणारा नाद , ती किणकिण आणि ताट वाजवल्यावर त्यातून होणारा झंकार करून पाहिले . ते सगळं इतका आनंद होतो की मग त्यापुढे आईचं , ' आता पुरे करा रे आवाज ' हे रागावणं फारसं काही मनाला लागत नाही . कधी कधी मात्र हे उद्योग जास्त वेळ चालले तर  कानाखाली आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर गाणंही . काय ? केले आणि ऐकलेही असतील न असे आवाज तुम्हीही ?



लहानपणी संगीतकार म्हंटल की खरंतर फारसं कळत नव्हतं .  जसजस कळायला लागलं तसतस हेही लक्षात आलं की कुठलही वाक्य गाण्यासारख गाता येऊ शकतं आणि संगीत तर अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंमधूनही निर्माण होऊ शकतं .



संगीत  इतक्या ठिकाणी ऐकू येत की यादी करू म्हंटल तर कित्ती तरी मोठ्ठी तयार होईल . म्हणजे बघा निरनिराळी वाद्य तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत . संगीत फक्त त्यातूनच निर्माण करता येत का ?  थोडं कान देऊन ऐकलं तर प्रत्येक ठिकाणी #संगीत # ऐकू येत . प्रत्येक वस्तू मध्ये संगीत दडलेलं असतं .





पानांची सळसळ  , सोसाट्याने सुटलेल्या वाऱ्याचा सु सु आवाज ,  भांडी पडल्यावर होणार आवाज ,  कोल्हापुरी चपलांचा कुरकुर आवाज , पावसाचा आवाज ,  रिपरीप पडतांना वेगळा ,  मुसळधार पावसाचा आवाज अजून निराळा आणि गारा पडत असतील पावसाबरोबर तर अजून वेगळा . त्याचवेळी जर कडकन् वीज चमकली तर त्यानंतर ऐकू येणारा गडगडाट , जोरात आवाज झाल्याने खळकन फुटलेल्या खिडकीचा आवाज  , पैंजण किंवा छल्ला यांचा #आवाज # ,  टाळ्या , चुटकी किंवा पायाने धरलेला ठेका , शाळेत किंवा कॉलेज मध्ये मित्रांच्या  पार्टीत टेबल वर tap करून दिलेली तबल्याची साथ , ओठांनी केलेला चक चक आवाज , दातात तार पकडून त्यावर बोटाने काढलेले # झंकार # स्वर # , गाण्याला शिट्टीने  दिलेलं संगीत किंवा शिट्टी वाजवतच गायलेलं गाणं , 
काढलेले विविध प्राण्यांचे आवाज , शाळेची घंटा , बसने दाबलेला कर्कश्य ब्रेक ,  नळाच टप टप कशावर तरी पडणार पाणी , पाणी बादलीत अथवा  मग्यात पडतांना होणारा आवाज , लयीत  वाजवलेल्या ताटवाट्या यांचा आवाज ,  ग्लास मध्ये किंवा बादलीत उंचावरून पाणी घालतांना होणारा आवाज , बांगड्यांची किणकिण , दुधात किंवा सरबतात साखर घोळतांना होणारी टीणटीण ,  शाळेची बस , घरच्या गाडीचा रोज लयीत  वाजणारा हॉर्न ,  gate चा आवाज ,  हिंजीस गंजल्यामुळे होणारा करकर आवाज , पंख्याचा चा फिरतांना होणारा गर्रर्रर्र गर्रर्रर्र असा आवाज , शंख कानावर ठेऊन त्यातून ऐकू येणारा समुद्राचा आवाज . कित्ती कित्ती ठिकाणी निरनिराळे आवाज ऐकू येतात . बापरे , मीच थकले आता विचार करून करून .



एखादा आवाज लयीत ऐकू येत असला किंवा केला तरी  त्यातून संगीत निर्माण होतं . हे आणि असेच अनेक आवाज जेव्हा कुठल्या शब्दांबरोबर चपखल बसतात तेव्हा तयार होत अर्थपूर्ण संगीत आणि गाणं .  





आपण सगळ्यांनी '#पडोसन# ' सिनेमातल ' #मेरी सामनेवाली खिडकी में# ' हे गाणं ऐकलंय . त्यात #R D Burman# यांनी कंगवा  घासल्यावर येणाऱ्या आवाजाच संगीत दिलंय . पंचमदांनी दिलेलं संगीत खरंच अफलातून आहे . ही # सृजनशीलता # गाणं पाहतांना , ऐकतांना  अचंबित तर करतेच त्याबरोबर नतमस्तक होतो आपण या सृजनशील संगीतकारासमोर .  उदाहरण द्यायचं झालं तर '#होगा तुमसे प्यारा कौन #' या गाण्यात sand paper एकमेकांवर  घासून आणि बांबू एकमेकांवर आपटून होणाऱ्या आवाजाचा  संगीत म्हणून उपयोग केला आहे . '#चुरालिया है तुमने जो दिलको# ' या गाण्यात , काचेचे ग्लास आणि चमचे यांनी निर्माण होणारा आवाज संगीत म्हणून वापरला आहे . कुठल्या गाण्यात Mike समोर गुळण्या करून तो आवाज तर कुठल्या गाण्यात डब्बे तर कुठे अजून काही .  अजून कितीतरी वेगवेगळ्या वस्तू वाद्य म्हणून वापरून त्यांचा आवाज संगीत म्हणून दिलाय त्या अवलीयाने . त्या बद्दल बोलावं , लिहावं तेवढं कमी आहे . कधी कधी वाटत जर त्याकाळात synthesizer असता तर त्यांनी आपल्यावर केलेली ही संगीताची जादू अजून कुठल्या उंच स्तरावर  नेऊन ठेवली असती . हे विचार करण्याच्या पलीकडे आहे .



जसा शब्दांना अर्थ , भाव  असतोच तसाच संगीतातही तो भाव निर्माण करण्याची ताकद असते  . कुठल्या संगीताने  मनात भीती निर्माण होते तर  कुठल्या संगीताने शहारे येतात .  कुठल्या संगीतात प्रसन्नता असते तर कशाने आनंद मिळतो .  कशाने  करुणा , दया निर्माण होते  तर कुठल्या संगीताने अजून कुठला भाव . नेमका  भाव तयार व्हावा यासाठी निरनिराळ्या साधनांचा लयबध्द आवाज  करण्यासाठी उपयोग केला जातो .  असो .



आवाज हा कानांवर पडतो मात्र संगीत ही ऐकण्याची चीज आहे .  संगीत हे ऐकलं तरच ऐकू येत . ते सगळ्या ठिकाणी आहे . झाडाच्या पानांची सळसळ असो की बासरीवर वाजवलेले #सूर# . आवाज सगळीकडे होतच असतात पण  याच आवाजांना जेव्हा सूर गवसतो  तेव्हा संगीत निर्माण होत .



जसे आवाजातले सूर गवसले की संगीत निर्माण होतं  तसच जीवनात सूर गवसले की आयुष्यही #सुरेल # संगीत होतं . खरंच असे जीवनातले सूर सर्वांना गवसले तर ? तर प्रत्येकाचे #जीवनगाणे # हे सुरेल संगीत होईल . होईल न ? असेच होवो हीच मनिषा .




#meresamnewalikhidkime, #RDBurman, #जीवनगाणे, #पडोसन, 







Sunday, 5 July 2020

फुलपाखरू

फुलपाखरू

पावसाळा सुरू झाला तशी सगळी झाडं कशी आनंदून गेली . प्रत्येक पानांवरून ओघळणारे थेंब जणू त्यांचे आनंदाश्रूच .  तप्त उन्हाळ्यात तापल्यावरही सर्वांना सावली देणाऱ्या झाडांनी पावसाने भागलेल्या तृष्णेनंतर व्यक्त केलेला आनंदच तो .  ती टवटवीत झालेली झाडं आणि त्यावर आता नव्याने फुललेली फुल . बागेत अगदी आनंदोत्सव साजरा होतोय असंच  वातावरण निर्माण झालय .


कुठलाही आनंदोत्सव साजरा होतांना त्यात आजूबाजूचे सगळे सामील होणारचं , हो न . यात प्रामुख्याने दिसायला लागली आहेत फुलपाखर . काही पिवळ्या रंगांची , काही पोपटी , काही काळी त्यावर रंगीत ठिपके असलेली , काही राखाडी रंगांची , काही निळी आणि त्यावर पिवळे ठिपके असणारी , अशीच आणि अजून कितीतरी . काही लहान काही मोठी . कित्ती कित्ती प्रकार आणि रंग . सगळेच सुंदर .  जेव्हा ते पानांवर किंवा फुलांवर बसतात तेव्हा फुलपाखरू तर सुंदर दिसतच तसच ते त्या पानांचही सौन्दर्य वाढवत .  


या फुलपाखरांच  या फुलांवरून त्या फुलांवर  उडत जाण पाहतांना कस सगळं विसरल्या जातं , वेळ , काळ आणि आपलं वयही  . त्यांचं सौन्दर्य , त्यांचे नाजूक पंख , त्यांची ती भिरभिर उडणारी आकृती , छोटी पतंगच जणू. त्यांना मांजा बांधलेला नसतो इतकंच . त्यांना दोरी बांधून स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे  उद्योग लहानपणी करायचा प्रयत्न केल्याचं आठवतंय सगळ्यांना , हो न . फुलपाखराला हातात घेण्यासाठी किमान त्याच्या मखमली पंखांना जवळून पाहायला मिळाव म्हणून अगदी  दगड , काटे बोचण्याची पर्वा न करता त्याच्यामागे जाणं हे त्यावेळचे छंद . त्यावेळी अस वाटत की हे फुलपाखरू माझा मित्र असावं .  त्याने माझ्या खांद्यावर बसून राहावं . त्याने मला सोडून कुठेही जाऊ नाही , हो न . केलेत
आपण सगळ्यांनीच असे उपद्व्याप . असो .

फुलपाखरू पाहतांना मला नेहमी शाळेतली श्री ग . हा . पाटील यांची फुलपाखरू ही #कविता# आठवते

फुलपाखरू । छान किती दिसते ।फुलपाखरू।। 
 
या वेलींवर । फुलांबरोबर गोड
किती हसते । #फुलपाखरू #।

पंख चिमुकले । नीळेजांभळे ।
हलवूनी झुलते । फुलपाखरू ।

डोळे बारीक । करिती लुकलूक ।
गोल मणी जणू ते । फुलपाखरू ।

मी धरू जाता । येई न हाता ।
दूरच ते उडते । फुलपाखरू ।

अगदी असच वाटत न फुलपाखरु पाहिले की . या कवींनी कित्ती साध्या , सोप्या शब्दात लहानपणी मुलांना जे वाटतं  त्याच वर्णन केलंय , व्वा .

फुलांवर असतांना फुलपाखराने पंख उघडझाप करत तिथे बसून राहणं आणि आपण जवळून पाह्यला गेल्यावर पटकन उडून दुसऱ्या फुलावर जाऊन बसणं , सगळंच कस मोहक . हा मोहकपणा तर मनाला भावतोच त्याच बरोबर भावतं त्याच स्वछंदी बागडणं . काय होत न असं .  त्याच बागेत बागडणं पाहून मनाला खरंच खुप निखळ आनंद मिळतो .

आत्ता आपल्याला दिसतात आहेत ती फुलपाखर . त्या आधी काही दिवसांपूर्वी आपल्याला अळी किंवा #सुरवंट# म्हणू आपण , जेव्हा आपल्या बागेत एखाद्या झाडावर दिसला / ली तेव्हा ? तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती ? 
" अरे बापरे आता ही अळी झाडांची पान खाऊन टाकेल सगळी " अस म्हणून मग आपण त्या अळीला काडीवर किंवा पानावर उचलून बाहेरच्या कुठल्याश्या साध्या झाडावर ठेऊन देतो , ज्या झाडापासून आपल्याला काही नकोय . करतो न अस आपण सगळे ?  यात काही चूक आहे असं म्हणत नाही मी . अळी आवडत नाही आपल्याला हे मात्र खरं  . पानं खाते म्हणूनही आणि तीच त्यावेळेच रूपही आपल्या मनाला फारसं भावतं नाही .

 फुलपाखराच्या आयष्यात चार अवस्था असतात . सुरुवातीला अंडी मग अळी त्यानंतर #कोष# आणि शेवटी फुलपाखरू . बरोबर ? पानांमागे कधी अंडी दिसली तरी ते पान आपण झाडावरून काढून दुसरीकडे नेऊन ठेवतो . अळी दिसली कधी पानांवर तरी तेच करतो . कोष दिसला तर मात्र आपण त्याला काही करत नाही . का ? तर आपल्याला माहिती असतं की याचा आपल्या झाडांना आता काही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून आज न उद्या फुलपाखरू बाहेर येणार . जे पाहायला आपल्याला नक्कीच आवडत  . बरोबर न . मग तर आपण अगदी वाट पाहू लागतो . रोज तो कोष कसा आहे , फुटला का ? त्यातून कुठल्या रंगाचं फुलपाखरु बाहेर येतंय याकडेही आपलं लक्ष असतं , हो न .

succcess आवडतो सगळ्यांना मात्र त्यामागची मेहनत , धडपड  नजरेआड करतो आपण . कुणीतरी म्हटलंय न " there is no shortcut to success "

फुलपाखरांच्या  अंड ते फुलपाखरू हा प्रवास खरंतर फार खडतर असतो . त्याच्या सगळ्या अवस्था पाहायला आपल्याला आवडत नाही  , आवडतं ते फक्त फुलपाखरू. त्याच्या जवळ  गेलं की ते उडून दुसरीकडे जाऊन बसत .  हातात येत नाही .  हात लावू देत नाही . जवळ येऊ देत नाही . त्याला आठवत तर नसेल त्याच्या आधीच्या अवस्थेत त्याला आपण दूर केलेलं ?

हेच आणि कदाचित असच आपण दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या  लोकांशी  वागतांना तर करत नाही  ना ?  आपलं लक्ष असतं फक्त यशस्वी लोकांकडे . फुलपाखरांच्या बाकी अवस्था जशा आपण दूर ठेवायचा प्रयत्न करतो तसच  आपण दैनंदिन जीवनात  करतोय का ?
काय वाटतं तुम्हाला  ?




#butterfly, #फुलपाखरूकविता,