Followers

Saturday, 27 July 2019

रंग

रंग



रंग ......

यावर खरंच काय लिहिणार ......रंग म्हणजे रंग ........अजून काय ........रंगेबिरंगी .....म्हणजे हिरवा , लाल , निळा , पिवळा,  गुलाबी ........आणि अजून कितीतरी रंग ..... ..  अजुन काय बर .......पानी तेरा रंग कैसा ......जिसमे मिलाये वैसा ........रंग माझा वेगळा  ......
 ........असेही म्हणतात ......यातला रंग चा अर्थ  काय आहे ... ...रंग वेगळा म्हणजे  मी लाल,  निळा किंवा हिरवा आहे असा तर नक्कीच नाही ...... मग काय .....

खरतर रंग म्हंटल की आठवतात फुलांचे ....पक्ष्यांचे....फळांचे भाज्यांचे , झाडांचे  ....मासोळ्याचे , फुलपाखरांचे...आकाशाचे ......ताऱ्यांचे , ग्रहांचे , रत्नांचे , दगडांचे ......म्हंटल तर विविध रंगांनी नटलेल्या निसर्गातील सर्व जीव जिवाणूंचे .....किती म्हणून किती नाव लिहावी .....ही list वाढतच जातेय .......तर थोडक्यात रंग हा निसर्गातल्या प्रत्येकाला आहे ......बरोबर .......अजून थोडा विचार केला तर जाणवतं की ....रंग प्रत्येक मानवनिर्मित गोष्टींना  आहे ...... त्यात प्रकर्षांने सर्वाना आवडणारे म्हणजे घरांचे,  गाड्यांचे , कपड्यांचे , लहान मुलांच्या खेळण्यांचे आणि कितीतरी वस्तूंचे निरनिराळे रंग .......

रंग कुठलाही खरं तर छानच असतो ....रंगसंगती जर नीट झाली नसेल तर मात्र तो रंग मनाला भावत नाही ..... मला आवडला नाही हा रंग असं म्हणतो  आपण ..........प्रत्येक ठिकाणी काही ठराविक रंग खुलून दिसतात हे जरी असलं तरी काही रंग हे चांगले ,  काही रंग वाईट असं लोक ठरवून मोकळं होतात  .............कुठला रंग चांगला यावर कधी संवाद किंवा क्वचित वाद सुद्धा  होतात ....... जसं अगदी नेहमीच उदाहरण म्हणजे...... गोरा रंग चांगला .... काळा वाईट ......त्यावरून जगात आजपर्यंत अनेक लोकांवर अन्याय झाले...........racism ही जगातली फार मोठी मानवतेला  लागलेली कीड आहे ......कितीही वरकरणी आव आणला तरी काही लोक स्वतःला superior समजतात ....मात्र  गंम्मत या गोष्टीची वाटते की काही लोक स्वतःमध्ये काही  कमी आहे असं मानतात  ......समजतात ..........खरंतर आपण कितीतरी गोरे नसलेले लोक यशस्वी झालेले पाहिले आहेत पण तरीही खूपदा समाजात रंगावरून टिंगल करणारे लोक दिसतात ....... रंगावरून हिणवल्या जात .....कुणाला तरी कधी कोळसा असही चिडवलं जातं ......त्यावेळी ह्याच कोळश्याची सावरकरांनी अंदमानात केलेली लेखणी आपण विसरतो ......केवढं त्याच मोल.....हाच कोळसा जेव्हा चुलीत किंवा power plant मध्ये वापरल्या जातो तेव्हा अन्न तर तयार होतच तसच लाखो घर प्रकाशात उजळून निघतात ... ...बरोबर न ......... ......दूर कशाला जा ...... आपल्याकडे म्हण प्रचलित आहे....... गोरी सब गुण चोरी .....खरतर  भारतातल्या  समाजात पुष्कळ मुलींची रंग ही खूप मोठी समस्या आहे .....आहे असं म्हणण्यापेक्षा तशी त्यांची मानसिकता तयार केली जाते .......लहानपणा पासून तस सांगितल्या  जात ...............मुलांना याचा त्रास थोडा कमी होतो .....पण होतोच ........रंगापेक्षा गुण महत्वाचे हे शिकवणारी  घर आजही आपल्या समाजात कमी आहेत हे  आपण बघतो ......असो .... जरा विषयांतर झालं ......


कधी कोणी विचारल तुझा आवडता रंग कुठला .....तर एक ,  दोन कधी तिसरा रंग सांगू आपण ...... खरंच असे थोडेच रंग आवडतात का सगळ्यांना......रंग हे सुदधा परिस्थिती प्रमाणे आवडते होतात कधी नावडते होतात ......खरं नाही वाटत .......बघा  ......आपले कुठलेही रंग आवडते असले तरी   flag चे रंग म्हंटल की आपल्याला तिरंग्याचे रंगच आकर्षित  करतात .....हो न ......एकदा  अटारी बॉर्डर वर जाऊन हातात तिरंगा धरून पहा ......त्या
रंगाकडे पाहून किती अभिमान वाटतो ......त्यावेळी त्या पेक्षा कुठलाच दुसरा रंग सुंदर दिसत नाही .......

ज्या काळ्या रंगाला कुठल्याही पवित्र कार्यांत पूर्वी नाकारल्या जात होतं .....त्यावेळी सुद्धा शाळेतल्या पाट्या आणि फळे काळ्या रंगाचेच होते ......त्या फळ्यांना नाही कुणी वाईट म्हंटल ना त्याचा रंग  कधी कुणी बदलला ......बरोबर न ......त्याच कारण कदाचित हे सुद्धा असू शकेल  की काळ्या रंगावर जर पांढऱ्या रंगाने लिहिलं तर ते सगळ्यात मागे बसणाऱ्या विद्यार्थ्याला पण नीट दिसत.....

काळे कपडे सणावाराला घालायचे नाहीत असा दंडक करणारे घरच्या लहान मुलांना तीट ही काळीच लावत ......डोळ्यात काळ काजळ घालणं हे त्यावेळच प्रसाधन   ......

पांढरा रंग हा पावित्र्याचा रंग मानला जातो पण पूर्वी या रंगाचे कपडे घालणं याला सुतकी कपडे घातले अस म्हंटल जायचं ......किती परस्पर विरोधी विचार होते .....एवढंच कशाला जर त्यावेळी कुणी व्यक्ती चांगली नाही हे सांगायचं असेल तर ती व्यक्ती पांढऱ्या पायाची आहे असं म्हटलं जातं होत ......मग पांढरा रंग हा पवित्र की नाही .....हे कदाचित त्यावेळी लोकांना नीटसं ठरवता आलं नसावं .....असो आज या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर आला आहे समाज ......

रंग म्हंटल की अजून किती वाक्य आठवतात बघा .....आज पावसाचा रंग दिसतोय .....रंगेल माणूस आहे ......रंगीत तालीम सुरू आहे ...........रंग बदलेले दिसतायत .......कधी रंग पालटले कळणार पण नाही ........आज गप्पा मस्त रंगल्या .......रंगरंग करतो बाबा तू .......या वाक्यात रंग म्हणजे नेमकं काय ......
आज निराळाच रंग दिसतोय याचा......यातला रंग म्हणजे .....
रागरंग काही नीट नाही दिसत याचे ......यातला रंग म्हणजे ........मुझे रंग दे या  गाण्यातला रंग म्हणजे ......रंग दे बसंती चोला  यातला ........रंग भरे बादल से रंग चुरा के  यातला ....अशी खूप गाणी आहेत .... .....मजा वाटते न .....आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कितीतरी दुसरे....... कधी लक्षात न आलेले  पण आपण नेहमीच वापरत असलेले वाक्य प्रयोग मिळत जातात आणि त्यातले विविध अर्थ सुध्दा ... ....हो न ...... ...........wow ......मज्जा वाटते न असा विचार करायला.....गाल रंगतात बरं कधी कधी आणि कधी कधी गुलाबी  होतात गुलाबी स्वप्न पाहतांना .......थंडी सुद्धा गुलाबी असते सुरुवातीला हिवाळ्यात ................खरंच रंग या शब्दात किती रंग आहेत .....किती भाव आहेत ......प्रत्येक वाक्यागणिक रंगाचा रंग बदलत जातो..... म्हणजे  ...अर्थ बदलत जातो ......कधी त्याचा अर्थ परिस्थिती असतो तर कधी मूड .....कधी वाईट सवयी तर कधी अजून काही ......

तरीही रंग म्हंटल की पहिले आठवतात ते सुंदर रंगच .....जे पाहून मन आकर्षित होत मग ते फुलांचे रंग असो की जलचर प्राण्यांचे....... वन्य पशूंचे किंवा  पक्ष्यांचे......इंद्रधनुष्याचे.............सूर्योदय सुर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या सुंदर आकाशाचे ........ रंग या शब्दापासून आज कितीतरी अर्थ मनुष्याने निर्माण केले असले तरी रंग हे रंगवण्यासाठी च असतात ..........काही जग , जगातल्या वस्तू रंगवतील तर काही मन ......काचेची पारदर्शक वस्तू सुंदर दिसते ......तसच रंगीत असे कॅलीडोस्कोप मधले बांगड्याचे तुकडे सुद्धा मनाला फार आकर्षित करतात ........लिलीच्या फुलांचा पांढरा शुभ्र रंग जसा मनाला प्रफुल्लित करतो तेवढाच मोराचा पिसारा मन उल्हसित करतो ........रंगेबिरंगी भरजरी नक्षीकाम केलेली शेरवानी जेवढी मनाला आकर्षित करते तेवढाच आर्मीचा गडद हिरवा रंग या बद्दल एक वेगळं आकर्षण असतं .........त्या रंगाकडे बघतांना त्यात असलेलं शौर्य सुदधा जाणवत ..... ..ते नकळत कुतूहल आणि मनात आदर निर्माण करत ........प्रत्येक रंगाची स्वतःची अशी एक गोष्ट असते ......त्यामागे काही संदर्भ असतात .... ..ते फक्त रंग नसतात तर त्या मागे एक  भावना असते ......कुठे सौन्दर्याची  तर कुठे पराक्रमाची , कुठे शालीनतेची , कुठे गौरवाची , कुठे प्रेमाची , कुठे मातृत्वाची .....ते मातृत्व काळ्या मातीचंही असू शकतं ........अशा रंगीत रंगामध्ये राहायला सर्वांनाच आवडत ....... साधी पतंग किंवा बॉल , खेळणं जरी घ्यायच असेल तरी छोटे मुलं देखील त्यात रंगेबिरंगी असलेली वस्तू  निवडतात  ......बरोबर न .......तसच ......आपण सर्वांनी सुद्धा विविध रंगांनी स्वतःच आयुष्य नटवून ते मनसोक्त जगण्याचा , आनंद घेण्याचा प्रयत्न करायला हवा..........हाती प्रयत्नांचा कुंचला धरून विविध रंग आयुष्यात भरण्यात प्रत्येक जण यशस्वी होवो हीच मनीषा .



#मुझेरंगदे , #कॅलीडोस्कोप , #रंगमाझावेगळा , #सावरकर, 

Saturday, 20 July 2019

पहिला पाऊस

पहिला पाऊस


आज पाऊस आला खूप दिवसांनी .......उन्हामुळे गरम झालेल्या जमिनीचा पाऊस पडून ओली झाल्यावर येणारा गंध .....अहाहा ....त्याला तोडच नाही......कुठलाही सुगंध त्यापुढे फिका पडतो ......मृदगंध .....हा शब्द मनात येताच गार वाटत .....हो न .....तो वारा जाणवतो ...सुगंध दरवळतो मनात ...... या शब्दातच हे सर्व करण्याची किमया आहे ......

आठवा तो लहानपणी शाळेत असतांना चा दिवस ......शाळा एकतर नुकतीच सुरू झालेली असायची किंवा अजून एकदोन दिवस असायचे शाळा सुरू व्हायला ......ज्या दिवशी पहिला पाऊस यायचा त्यादिवशी हमखास सगळी मुलं त्या पावसात भिजत खेळायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणीही त्या पावसात भिजल्यावर रागवत नसत कपडे खराब झाले तरी ......बरोबर न .....त्यावेळी खरतर मातीला येणारा तो सुगंध आवडत असला तरी फारस काही कळत नव्हतं .....पावसात खेळणं हे प्रामुख्याने ध्येय असायचं ......शाळेतून येतांना जरी पाऊस पडला तरी नुकतीच शाळा सुरू झालेली असल्याने पुस्तक दप्तरात नसायची .....असलीच एखादी वही तर ती रफ असायची त्यामुळे ती ओली होण्याची भीती पण नसायची ......शाळा जवळ असली आणि पायी जर घरी येत असु तर......... मग तर धमाल असायची .......हमखास घरी जायला उशीर व्हायचा ......त्या पावसात दोन हात बाजूला ठेवून चेहरा वर करून पावसाचे तुषार चेहऱ्यावर घेतांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय आहे ........घरी गेल्यावर आई दारात हातात टॉवेल घेऊन असायचीच .....हो  .....आधी बाहेर पायावर पाणी घेऊन पायाला लागलेला चिखल धुवायचा आणि मग तिने दिलेला टॉवेल घेऊन अंघोळीला जायचं .....एवढाच नियम ......आणि अंघोळ करून आल्यावर मिळणार गरम गरम दूध तर कधी गरम सूप आणि त्याबरोबर मिळणार काहीतरी गरमागरम खाण .....वा ......त्यावेळी त्या दुधाला अमृततुल्य चव असायची आणि ते खात पीत असतांना तो आईचा केस कोरडे करण्यासाठी केसातून फिरणारा पदर ......त्यावेळी केस कोरडे करत जा रे .....अस सांगतांना तिच्या आवाजातली ती काळजी .......अर्थात हे सगळं त्यावेळी काही कळत नसे ......पण आता जाणवतं .....आणि ती आठवण मृदगंधा सारखीच दरवळते ...........पहिल्या पावसाची मजाच न्यारी .....
आजही पाऊस पडला त्यावेळी या आठवणी तर आल्याच  ....पण भिजल्यावर लक्षात आलं की अरे आजकाल भिजतांना पूर्वीसारखं बिंधास्त..... मनसोक्त ....भिजत नाही आपण मोठे झाल्यावर ......सर्दी झाली तर , हा ड्रेस खराब होईल , बाहेर आहोत आपण , कुणी पाहिलं तर काय म्हणतील , मुलं शाळेतून यायची वेळ झाली ....जेवायला आज काय करायचं , केस खराब होतील .....मीटिंग ला जायचंय .....एक ना अनेक अशा विविध कारणांनी भिजायचं पुढे ढकलतो आपण आणि मनसोक्त आनंद न घेता तो क्षण तसाच रिकामा राहतो त्यात आठवणी तयारच होत नाहीत .....खरंतर प्रत्येक क्षण आपण जगलो तर कितीतरी आठवणींचे सुंदर डोंगर आपल्या आयुष्यात तयार होतील.....त्यावर कधी निवांत वेळी जाऊन बसतांना परत तो आनंद आपण अनुभवू शकू  ......पण आपणच या सगळ्या गोष्टी दूर सारतो ....वेळ नाही या नावाखाली ......बरोबर न .......

पाऊस पडून गेल्यावर ऊन पडल्यानंतर ....इंद्रधनुष्य दिसतं  ....ते कुठपर्यंत आहे हे पाहायला लहानपणी  दूरपर्यंत जाण आजही मनाला आनंद देत ......मग त्या रस्त्यावरून ते अजून मोठं दिसतं .....ते जमिनीला टेकल्यासारखं दिसतं आहे ......तर कुठे कुठल्या तरी घराच्या गच्चीवरून अजून मोठ्ठ दिसतंय अस मित्रांनी सांगितल्यावर ते बघण्याची धावपळ .......सगळं कसं मनाला आजही आनंद देत .......आजही इंद्रधनुष्य दिसलं ......छान मोठ्ठ .....

बागेतली सर्व झाडं छोटी मोठी पावसात न्हाहून निघालेली होती .......जसं लहान बाळ अंघोळ झाल्यावर दिसतं तस .....एकदम फ्रेश ......पावसाचं पाणी पिऊन टवटवीत झालेली ती झाड , पान वाऱ्यावर डोलत होती .......त्यावर पडणाऱ्या उन्हामुळे अस वाटत होतं जसा हिरवा प्रकाश पसरला आहे .......पानावरुन हळूहळू घसरत खाली पडणारे पाण्याचे थेंब ......काही पानांवर तर काही कळ्या आणि फुलांवर थांबलेले ते पाण्याचे थेंब पाहून .......लहानपणी ची आठवण झाली ........त्यां थेंबांना एकमेकांकडे नेण्यासाठी बोटाने करून दिलेली वाट आठवली .............ते थेंब मोठे होत जाऊन मग खालच्या पानावर तो मोठा थेंब पडणं पाहायला किती मजा यायची .....व्वा .........आणि नंतर तिथून मग अजून खाली जात जात हळूच मग त्यांचं एक पाण्याची धार होत खाली जाण ....ते बघण्यात होणारा आनंद .....फाटकाच्या लोखंडी ग्रिल वर मोत्यांच्या माळे सारखे दिसणारे  लटकलेले ते पाण्याचे थेंब ......तो एक एक थेंब हळूच बोटावर घेऊन हाताच्या मध्ये ते कसे गोळा होतात हे पाहण्याची मजाच न्यारी ......अहा .....पहिल्या पावसाने स्वतः बरोबर किती आठवणी आणल्यात  ......पाऊस थांबल्यावर ..... परत ते पाण्यात  फिरायला जाण .....पाण्यात कागदाची नाव तयार करून त्यांची शर्यत लावणं .....त्या मागे फिरत फिरत जाण ......ती नाव ओली होऊन बुडली तर परत दुसरी तयार करून आणणं  ......रस्त्यावर कुठेतरी सांडलेल्या पेट्रोल किंवा डिझेल च्या थेंबात दिसणारे सप्तरंग पाहणं ......त्याला काडीने हलवून परत ते दिसतात का ते पाहणं ......ते पसरवून मोठं करण्याचा प्रयत्न करणं ...........खुपसणी चा खेळ खेळणं .......तो खेळ फक्त  पावसाळ्यातच खेळायला मिळायचा .....तो खेळतांना दूर दूर पर्यंत जाण्यात जी मजा येत असे ती अवर्णनीय .....    आठवणींचा खजिनाच सापडला अस वाटतय आज .......पहिला पाऊस आला की या सगळया आठवणी तर येतातच पण पुन्हा ते सगळं करण्याची प्रबळ इच्छा पण मनाला देतात  ......सगळं जग हिरवं झाल्याचा भास होतो ......हिरवा प्रकाश पसरतो  ....मनाला टवटवीत करतो ......कुठली नवीन झाड लावावी हे विचार पण मनात यायला सुरुवात होते  ......उन्हाळ्यात करपलेली , मलूल झालेली झाडं परत मूळ धरू लागतात  ......खरंच पहिला पाऊस फक्त पहिल्यांदा बरसलेलं पाणीच नसतं तर अगदी शेतकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांच्या मनाला एक नवीन पालवी फुटण्यास प्रोत्साहित करणार अमृत असतं...... अस अमृत प्रत्येकाच्या आयुष्यात ते आनंदाचे क्षण परत परत आणून सर्वांचं आयुष्य प्रफुल्लित करो हीच मनीषा .



#कागदाचीनाव  , #मृदगंध  , #पहिला पाऊस

Sunday, 14 July 2019

पु ल एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

पु ल एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

या नावापेक्षा खरंतर सगळे मराठी वाचक ओळखतात ते पुलंना ......पुल म्हंटल की कसं अगदी कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलतोय अस वाटत ....हो न ....मला तर खूपदा वाटत आलय की हा एक पूल आहे ज्यावरून जातांना कितीतरी मनाला भावणारी ,  विरंगुळा देणारी , मनोरंजन करणारी , विविध भाव मनात जागवणारी विहंगम दृश्य दिसतात.........

या विषयावर कदाचित खूप लोकांनी आणि खूप वेळा लिहिलं असेल.... मी जे लिहितेय ते मला दिसलेले पु ल ....जे सुरुवातीला बटाट्याची चाळ यातून मला पहिल्यांदा भेटले .......पुस्तकांची नावं काय काय लिहावी .....वाचली तर खुप पण आज जेव्हा या विषयावर लिहू म्हंटल तर विचार आला .......त्यांनी फक्त पुस्तकच लिहिलीत का ? ......आपण सगळे पुलंना लेखक म्हणूनच ओळखतो का ? ....  .पुलंच लिखाण समृद्ध तर होतच पण ते वाचतांना जाणवतो तो त्यातला अप्रतिम निरीक्षण करू शकणारा माणूस .....मग ते खाद्य भ्रमंती असो किंवा पर्यटन .....एखाद्या गावातलं वर्णन असो , शहरातल असो किंवा परदेशातील ......निरीक्षण शक्ती  अफाट आणि ते लिहिण्याची भाषा जेवढी समृद्ध तेवढीच मिश्किल सुद्धा .....त्यातल्या कोट्या असोत किंवा कोपरखळ्या ......कुणालाही न दुखवता विनोद कसा करावा ही खूप मोठी त्यांनी सर्वांना दिलेली एक शिकवण आहे........

विनोदी लिखाण जरी त्यांनी जास्त केलेलं असलं तरी त्यांनी जे 1970 च्या emergency मध्ये लिहिले ते काही लेख माझ्या वाचण्यात आले .....त्यावेळच्या सरकारला दिलेल्या कोपरखळ्या....त्यातली बोचणारी भाषा हे पण ते लिहू शकतात आणि ते पण इतक्या सक्षमपणे .....त्यावेळच्या सरकारला न घाबरता केलेलं ते लिखाण वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो ......

अजूनही मी लिहितेय ते लेखनाबद्दल .......कारण इतकं अफाट आणि अचाट करणार लेखन आहे की किती लिहावं तेवढं कमीच .....त्यात विविधताही तेवढीच .....असो .....तर असे हे पूल जेव्हा गुळाचा गणपती सारखे चित्रपट काढतात ....चित्रपटात भूमिका तर करतातच पण विविध चित्रपटांचे दिग्दर्शन करतात ...... गाण्यांना चाली देतात .......नाटककार सुद्धा होतात ........वक्तृत्वा चे कितीतरी सफल एकपात्री प्रयोग करतात  ......हे सगळं करत असतांना त्या त्या प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन ती ती कला किती चांगल्या प्रकारे सफल होऊ शकेल या साठी प्रयत्न करतात ......विचार करा .....एखाद काम जर चांगलं करता येत असेल कुठल्याही व्यक्तीला ........तर ती व्यक्ती generally तेच काम आयुष्यभर करते ..........त्यात ते त्या व्यक्तीला आवडणारी कला असो अथवा कुठला व्यवसाय असो.....किंवा एखादा कलाकार ठराविक प्रकारच्या चित्रपटात काम करणं असो ......जी गोष्ट आपण यशस्वीरीत्या करू शकतो त्यात बदल करणं हे फारस कुणी करतांना दिसत नाही .......पण पुलंच्या आयुष्याचा जर आलेख पहिला तर जाणवतं की  ........  ही व्यक्ती त्या त्या क्षेत्रात उंच पोहोचल्यावर ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन पण परत तेवढ्याच उंचीवर जाऊ शकते........... आणि ते सोडून परत तिसऱ्या क्षेत्रात परत तशीच उंची गाठू शकते .... .......मला तर ते पाहून खूपदा असा भास होतो ......टारझन जसा आपण चित्रपटात बघतो न .....एका झाडाची फांदी सोडून दुसऱ्या झाडाची फांदी पकडून त्या दुसऱ्या झाडावर जातो मग तिसऱ्या .....अशा अनेक झाडांवर लीलया जातो  आणि परतीचा प्रवास पण तेवढ्याच लीलया करतो आणि नंतर जमिनीवर पण तेवढयाच सहजतेने आणि आत्मविश्वासाने  चालतो......तस वाटत हे  ......हो न ......एक वाक्य वाचलं होतं मागे मी  ......एखाद काम कुणीही मनुष्य जर चांगलं यशस्वीरीत्या करू शकतो तर तो कुठलंही काम तेवढच चांगलं करू शकतो  ....केवळ तेवढा प्रयत्न किंवा अभ्यास ती व्यक्ती लक्षपूर्वक करत नाही किंवा ते काम करायला तेवढा वेळ देत नाही ..... .....बरोबर न ..... आपल्याला सगळ्यांना वाटतं की मला हेच जमत बाबा.....ते कसं जमेल ?.....मला येणार नाही ......मी कधी केलंच नाही ते .....कसं करू .......जमेल का मला ............आणि हेच केवळ हेच विचार आपल्याला मागे खेचतात ......माणसाचा मेंदू म्हणतात फक्त 10 % च वापरतो प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात .....या लोकांना मात्र पाहिलं की प्रश्न पडतो आपण किती वापरत असू ?.........किती किती वेगवेगळी काम करत गेले असे लोक ..........पूल जेव्हा बंगाली शिकण्यासाठी शांतिनिकेतन मध्ये राहिले ते लिखाण वाचतांना त्यावेळचे त्यांचे अनुभव , त्यांची त्या वयातली निरीक्षण शक्ती अचंबित करते ..  .

खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हा शब्द पण अपुरा वाटतो अशा व्यक्तींबद्दल लिहितांना ...... आयुष्य पूर्ण जगणं म्हणतात ते कदाचित यालाच .......त्यांना शेवटी शेवटी बरं नसतांना घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटल होत की सकाळी उठल्यावर मला हात पाय हलवता येतात....मला दिसतंय ,बोलता येतंय न .....मग आजचा दिवस माझा .....ज्यादिवशी झोपेतून उठल्यावर यापैकी मला एकही काम करता येणार नाही त्यादिवशी मीच राहणार नाही तर मग विचार का करायचा ......प्रत्येक दिवस नवा .....उठल्यावर आज काय करु असा विचार करण्यापेक्षा.... मी काय काय करू आज .....दिवस तर सुरू झाला .........चला ....वा असे विचार ते व्हील चेअर वर होते तेव्हाचे ........तर मग जेव्हा ते सगळं लेखन , वाचन , नाटक ,  गाणी करू शकत होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी तर ते नक्कीच उत्साह आणि चैतन्याचा झरा असावेत ......

मला दिसलेले , भावलेले आणि उमगलेले असे हे पुल ......पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे .........एक आवडतं अष्टपैलू व्यक्तिमत्व .




#अष्टपैलूव्यक्तिमत्त्व , #गुळाचागणपती , #बटाट्याचीचाळ , #शांतिनिकेतन, #पुरुषोत्तमलक्ष्मणदेशपांडे , #पुलदेशपांडे