Followers

Saturday, 3 August 2019

सकाळ

सकाळ

सकाळ या शब्दातच किती प्रसन्नता आहे नं ..........

सकाळ म्हंटल की आठवतो उगवता सूर्य ..... प्रकाश  ......पक्ष्यांची किलबिल ..... ..मंद वारा .....किंचित गारवा ......वेलींवर , पानांवर , फुलांवर , गवंतांवर पडलेले दवबिंदू  .......त्यावर पडलेली सूर्याची कोवळी किरणं .....त्यामुळे दिसणार छोटंसं सप्तरंगी वलय  ........दूरवर थोडंस धुकं .....उडत जाणारे पक्षी ......झाडांवरून उडणारे ......इकडच्या झाडावरून तिकडच्या झाडांवर जाणारे  .......वेगवेगळ्या आवाजात काहीतरी सांगणारे निरनिराळ्या रंगांचे पक्षी ......सकाळी जेवढे पक्षी दिसतात तेवढे एरवी दिवसभरात कधी दिसत नाहीत ........खरंतर सगळे पक्षी वेगवेगळे आवाज करत असतात पण ते एकत्र ऐकतांना इतकं सुंदर वाटत .....त्या आवाजाला पक्ष्यांची किलबिल हे नाव कुणी शोधल कुणास ठाऊक  त्या नावातच सौंदर्य आहे ....हो न ........खूप माणसं एकावेळी बोलली तर त्याला गोंगाट म्हणू  ......किंवा कल्ला .....किंवा गोंधळ .... यापैकी कुठलाही शब्द नाजूक.... छान आवाज असा प्रतीत होत नाही .....

त्या त्या जागेप्रमाणे सकाळ सुद्धा निराळी असते  ........शहरातली सकाळ निराळी ..... गावातली निराळी ......नदीकाठची निराळी .......समुद्रकिनारी निराळी ........पहाडावरची निराळी ......पहाडाच्या पायथ्याशी निराळी ........हे निराळेपण  फार निराळं असतं ........ते सर्व
अनुभवतांना त्याच निराळेपण  भावून जात . ........

घड्याळात किंवा आजकाल मोबाईल मध्ये अलार्म झाला की झाली शहरातली सकाळ  .......मग पटापट सगळ्यांची शाळा किंवा ऑफिस ला जायची तयारी  ...स्वयंपाक ......नाश्ता .... डबे .....आणि धावपळ  .......सुट्टीच्या दिवशी काय तो थोडा आराम .....चहा ....पेपर वाचन ....... आजकाल मोबाईल वाचन  ..........

सकाळी रोज न चुकता फिरायला जाणारी जी जमात असते तिला मात्र अलार्म नको असतो ....आपोआप जाग येते त्यांना .....ते लोक खर तर सकाळ होतांना बघतात .....अनुभवतात ............घरातुन बाहेर पडतांना तसा उजेड नसतो फारसा पण कुठपर्यंत पोहोचल्यावर तांबडं आकाश दिसेल किंवा सूर्य वर येईल .....किरणं दिसतील  अथवा कुठले पक्षी कुठे दिसतील .....तसच कुठल्या शाळेची बस , मुलं कुठे दिसतील ......दिसली नाही तर ......आज मला उशीर झाला की त्याला .....की सुट्टी आहे शाळेला ......एक ना अनेक ......अशी सकाळ रोज अनुभवणं आणि यात सुद्धा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या, पशु पक्ष्यांच्या सकाळच्या हालचाली निरखत आनंद अनुभवणं या सारख सुख नाही .......पावसाळा असो की उन्हाळा ......इतकी या लोकांना सकाळी एकमेकांना पहायची सवय होते की ते ते लोकं दिसले की किती वाजले असतील याचा अंदाज येतो आणि नाही दिसले तर उशीर कुणाला झाला किंवा का आले नसतील याचा अंदाज बांधून पुढे मार्गक्रमण
करणं या लोकांकडून शिकावं .....

नदीकाठी , समुद्रकाठी सकाळ होतांना पाहायला तर दुरून दुरून लोक येतात ......ती पाहतांना खरच आप , तेज , वायू , पृथ्वी आणि आकाश यांचा जो अप्रतिम संगम ... .मिलाप अनुभवायला मिळतो  .....खरंच तो तसा कुठे अजून मिळत नाही .......त्या जमिनीवर समोर समोर येणाऱ्या  आणि परत हुलकावणी दिल्यासारख्या ..... किनाऱ्याला हात लावून ....आऊट करून परत  दूर जाणाऱ्या लाटा ......पाण्यावर पसरलेली कोवळी किरणं .....त्यामुळे चकचकीत दिसणार पाणी  ..... गार हवेमुळे जाणवणारा तो हवाहवासा वाटणारा गारवा ......निरभ्र आकाश ......त्यात पसरलेला तो सूर्याचा प्रकाश .......त्यामुळे झालेलं तांबडं आकाश किंवा रंगेबिरंगी म्हणूया ......खूप रंगांची उथळण झालेली दिसते पण त्यात प्रामुख्याने तांबडा रंग जास्त असतो म्हणूनच की काय  ..... म्हणतात न .....तांबडं फुटलं .....  अशा ठिकाणी सकाळ होताना ती अनुभवणं ......वा .....पंचमहाभूतांचा तो अवर्णनीय असा एकमेकां च्या सोबत चा विलोभनीय सहवास......तो सहवास आपल्याही मनाला फार प्रसन्न करतो ..... अशी ही अनुभवलेली  सकाळ नंतर कधीही जेव्हा आठवते तेव्हा मन प्रफुल्लित करते ......हा आठवणीतला ठेवा नुसते डोळे बंद करून आठवा ......तिथला तो सुगंध आजही आठवतो .....तो प्रकाश ....ते पाण्यावर उडणारे पक्षी ....तो पाण्याचा आवाज .....ते आकाश .....ते आकाशातले रंग .....तो टरबूजा सारखा दिसणारा मोठ्ठा सूर्य ......पायांवरच ते झुळझुळणार गार पाणी , हवेतली ती छान गुलाबी थंडी.......बंद डोळ्यांना हे सर्व दिसतं आणि मनाला पाण्याचा , हवेचा गारवा देतं .......

खरतर सकाळ ही सगळ्यांसाठी होते .....अगदी डोंगर , नदीकाठी राहणाऱ्यांसाठी ......तसच गावात शहरात .....अगदी कुठेही राहणाऱ्यांसाठी ........पण कुणी ती सकाळ अनुभवत तर कुणी नाही ........कधी कुणाला वेळ नसतो तर कधी किती वाजले या पलीकडे सकाळ या शब्दाला अर्थ नसतो ...... फक्त झोपून उठणं म्हणजे झाली सकाळ .......मुलं उशिरा उठले की आई रागावते न .......झाली यांची सकाळ ......

आजकाल प्रत्येकाची सकाळ मात्र वेगवेगळ्या वेळी होते .....कुणाची सकाळ ही पहाटे 4 वाजता सुरू होते .....तर कुणाची अगदी 10 वाजता सुद्धा होते ........कारण आजकालची जीवन पद्धती  .......

 खरंच सकाळ या शब्दाचा  अर्थ इतकाच मर्यादित आहे की अजून काही अर्थ आहे याचा.....हा शब्द ज्या कुण्या व्यक्तीला पहिल्यांदा सुचला त्याला नक्की काय अभिप्रेत असेल .......

काळ म्हणजे phase ...... आयुष्यातला  टप्पा .....ती वेळ .....मग ती कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली असो ......आणि स म्हणजे चांगलं ......जस सकस अन्न , सद्गुण , सदभाव , सदाचार ......तसच सकाळ तर नसेल ......चांगला काळ ...........स काळ

सकाळ म्हणजे नवीन सुरुवात .....असा तर अर्थ अभिप्रेत नसेल ....  . मग ती दिवसाची असो अथवा आपल्या आयुष्यात येणार असलेल्या नविन  स्थित्यंतर बदलाची ......किंवा अजून काही .........

काही अडचण आली तरी स्वतःला किंवा दुसऱ्याला दिलासा देतांना आपण म्हणतो........ आता विचार नको करू ..... सकाळी बघू ......हो न ......कधी कुठल्या कठीण प्रसंगातून एखादी व्यक्ती जात असेल तर .....अरे रात्रीनंतर सकाळ ही होतेच ......ही पण वेळ जाईल ......सगळं ठीक होईल .....तू काळजी करू नको असा धीर देतोच न आपण .…...कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला .......ते गाणं आहे न ......फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश  .....ते ऐकतांना असं वाटत हाच तर खरा सकाळ शब्दाचा अर्थ आहे .......

सकाळ हा शब्द च नवीन सुरवात या कल्पनेशी जोडला गेलाय ....मग ती सकाळ नव्या दिवसाची असो किंवा कुठल्या सुरू केलेल्या कार्याची किंवा काही कठीण परिस्थिती नंतर येणारी अथवा सहज सुंदर झोप झाल्यानंतर उठल्यावर दिसणारी ......अशी सुंदर सकाळ सर्वांना जीवनात नेहमी अनुभवता येवो हीच मनीषा .......

12 comments:

  1. खूप छान, मनिषा तुझे शब्द सहज सोपे आणि अनुभवता येतात, लिहीत राहा, सकाळी सकाळी

    ReplyDelete
  2. नेहमी सारखाच सहज सुंदर लेख...

    ReplyDelete
  3. Kharach khup apratim lihila aahe .vachata vachata agadi dolyasamorun ujadalelya pahatech drushya anubhavila milala .aani tehi pratek thikanchi vegli pahat .khupch chan

    ReplyDelete
  4. नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लेख.....अप्रतिम लेख.....

    ReplyDelete
  5. सर्वांचे आभार 😊

    ReplyDelete
  6. सकाळी काढलेल्या सुरेख रांगोळी सारखा प्रसन्न लेख!!

    ReplyDelete
  7. सकाळी सकाळी , सकाळच्या चहा बरोबर वाचायला मिळालेला सकाळ लेख . अतिशय सुंदर !

    ReplyDelete
  8. Wah....Ek sunder sakal sangnara sunder lekh,agadi dolyasamor ti,ti sakal ubhi rahate....Chhan lihila aahes vahini....Keep going

    ReplyDelete
  9. फारच सुरेख लिखाण ...सगळ डोळ्यापुढे येत आणि असा वाटत की आपण हे सगळ अनुभवतो आहे आत्ता

    ReplyDelete
  10. सर्वांचे आभार🙏

    ReplyDelete