पु ल एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
या नावापेक्षा खरंतर सगळे मराठी वाचक ओळखतात ते पुलंना ......पुल म्हंटल की कसं अगदी कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलतोय अस वाटत ....हो न ....मला तर खूपदा वाटत आलय की हा एक पूल आहे ज्यावरून जातांना कितीतरी मनाला भावणारी , विरंगुळा देणारी , मनोरंजन करणारी , विविध भाव मनात जागवणारी विहंगम दृश्य दिसतात.........
या विषयावर कदाचित खूप लोकांनी आणि खूप वेळा लिहिलं असेल.... मी जे लिहितेय ते मला दिसलेले पु ल ....जे सुरुवातीला बटाट्याची चाळ यातून मला पहिल्यांदा भेटले .......पुस्तकांची नावं काय काय लिहावी .....वाचली तर खुप पण आज जेव्हा या विषयावर लिहू म्हंटल तर विचार आला .......त्यांनी फक्त पुस्तकच लिहिलीत का ? ......आपण सगळे पुलंना लेखक म्हणूनच ओळखतो का ? .... .पुलंच लिखाण समृद्ध तर होतच पण ते वाचतांना जाणवतो तो त्यातला अप्रतिम निरीक्षण करू शकणारा माणूस .....मग ते खाद्य भ्रमंती असो किंवा पर्यटन .....एखाद्या गावातलं वर्णन असो , शहरातल असो किंवा परदेशातील ......निरीक्षण शक्ती अफाट आणि ते लिहिण्याची भाषा जेवढी समृद्ध तेवढीच मिश्किल सुद्धा .....त्यातल्या कोट्या असोत किंवा कोपरखळ्या ......कुणालाही न दुखवता विनोद कसा करावा ही खूप मोठी त्यांनी सर्वांना दिलेली एक शिकवण आहे........
विनोदी लिखाण जरी त्यांनी जास्त केलेलं असलं तरी त्यांनी जे 1970 च्या emergency मध्ये लिहिले ते काही लेख माझ्या वाचण्यात आले .....त्यावेळच्या सरकारला दिलेल्या कोपरखळ्या....त्यातली बोचणारी भाषा हे पण ते लिहू शकतात आणि ते पण इतक्या सक्षमपणे .....त्यावेळच्या सरकारला न घाबरता केलेलं ते लिखाण वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो ......
अजूनही मी लिहितेय ते लेखनाबद्दल .......कारण इतकं अफाट आणि अचाट करणार लेखन आहे की किती लिहावं तेवढं कमीच .....त्यात विविधताही तेवढीच .....असो .....तर असे हे पूल जेव्हा गुळाचा गणपती सारखे चित्रपट काढतात ....चित्रपटात भूमिका तर करतातच पण विविध चित्रपटांचे दिग्दर्शन करतात ...... गाण्यांना चाली देतात .......नाटककार सुद्धा होतात ........वक्तृत्वा चे कितीतरी सफल एकपात्री प्रयोग करतात ......हे सगळं करत असतांना त्या त्या प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन ती ती कला किती चांगल्या प्रकारे सफल होऊ शकेल या साठी प्रयत्न करतात ......विचार करा .....एखाद काम जर चांगलं करता येत असेल कुठल्याही व्यक्तीला ........तर ती व्यक्ती generally तेच काम आयुष्यभर करते ..........त्यात ते त्या व्यक्तीला आवडणारी कला असो अथवा कुठला व्यवसाय असो.....किंवा एखादा कलाकार ठराविक प्रकारच्या चित्रपटात काम करणं असो ......जी गोष्ट आपण यशस्वीरीत्या करू शकतो त्यात बदल करणं हे फारस कुणी करतांना दिसत नाही .......पण पुलंच्या आयुष्याचा जर आलेख पहिला तर जाणवतं की ........ ही व्यक्ती त्या त्या क्षेत्रात उंच पोहोचल्यावर ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन पण परत तेवढ्याच उंचीवर जाऊ शकते........... आणि ते सोडून परत तिसऱ्या क्षेत्रात परत तशीच उंची गाठू शकते .... .......मला तर ते पाहून खूपदा असा भास होतो ......टारझन जसा आपण चित्रपटात बघतो न .....एका झाडाची फांदी सोडून दुसऱ्या झाडाची फांदी पकडून त्या दुसऱ्या झाडावर जातो मग तिसऱ्या .....अशा अनेक झाडांवर लीलया जातो आणि परतीचा प्रवास पण तेवढ्याच लीलया करतो आणि नंतर जमिनीवर पण तेवढयाच सहजतेने आणि आत्मविश्वासाने चालतो......तस वाटत हे ......हो न ......एक वाक्य वाचलं होतं मागे मी ......एखाद काम कुणीही मनुष्य जर चांगलं यशस्वीरीत्या करू शकतो तर तो कुठलंही काम तेवढच चांगलं करू शकतो ....केवळ तेवढा प्रयत्न किंवा अभ्यास ती व्यक्ती लक्षपूर्वक करत नाही किंवा ते काम करायला तेवढा वेळ देत नाही ..... .....बरोबर न ..... आपल्याला सगळ्यांना वाटतं की मला हेच जमत बाबा.....ते कसं जमेल ?.....मला येणार नाही ......मी कधी केलंच नाही ते .....कसं करू .......जमेल का मला ............आणि हेच केवळ हेच विचार आपल्याला मागे खेचतात ......माणसाचा मेंदू म्हणतात फक्त 10 % च वापरतो प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात .....या लोकांना मात्र पाहिलं की प्रश्न पडतो आपण किती वापरत असू ?.........किती किती वेगवेगळी काम करत गेले असे लोक ..........पूल जेव्हा बंगाली शिकण्यासाठी शांतिनिकेतन मध्ये राहिले ते लिखाण वाचतांना त्यावेळचे त्यांचे अनुभव , त्यांची त्या वयातली निरीक्षण शक्ती अचंबित करते .. .
खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हा शब्द पण अपुरा वाटतो अशा व्यक्तींबद्दल लिहितांना ...... आयुष्य पूर्ण जगणं म्हणतात ते कदाचित यालाच .......त्यांना शेवटी शेवटी बरं नसतांना घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटल होत की सकाळी उठल्यावर मला हात पाय हलवता येतात....मला दिसतंय ,बोलता येतंय न .....मग आजचा दिवस माझा .....ज्यादिवशी झोपेतून उठल्यावर यापैकी मला एकही काम करता येणार नाही त्यादिवशी मीच राहणार नाही तर मग विचार का करायचा ......प्रत्येक दिवस नवा .....उठल्यावर आज काय करु असा विचार करण्यापेक्षा.... मी काय काय करू आज .....दिवस तर सुरू झाला .........चला ....वा असे विचार ते व्हील चेअर वर होते तेव्हाचे ........तर मग जेव्हा ते सगळं लेखन , वाचन , नाटक , गाणी करू शकत होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी तर ते नक्कीच उत्साह आणि चैतन्याचा झरा असावेत ......
मला दिसलेले , भावलेले आणि उमगलेले असे हे पुल ......पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे .........एक आवडतं अष्टपैलू व्यक्तिमत्व .
#अष्टपैलूव्यक्तिमत्त्व , #गुळाचागणपती , #बटाट्याचीचाळ , #शांतिनिकेतन, #पुरुषोत्तमलक्ष्मणदेशपांडे , #पुलदेशपांडे
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
या नावापेक्षा खरंतर सगळे मराठी वाचक ओळखतात ते पुलंना ......पुल म्हंटल की कसं अगदी कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलतोय अस वाटत ....हो न ....मला तर खूपदा वाटत आलय की हा एक पूल आहे ज्यावरून जातांना कितीतरी मनाला भावणारी , विरंगुळा देणारी , मनोरंजन करणारी , विविध भाव मनात जागवणारी विहंगम दृश्य दिसतात.........
या विषयावर कदाचित खूप लोकांनी आणि खूप वेळा लिहिलं असेल.... मी जे लिहितेय ते मला दिसलेले पु ल ....जे सुरुवातीला बटाट्याची चाळ यातून मला पहिल्यांदा भेटले .......पुस्तकांची नावं काय काय लिहावी .....वाचली तर खुप पण आज जेव्हा या विषयावर लिहू म्हंटल तर विचार आला .......त्यांनी फक्त पुस्तकच लिहिलीत का ? ......आपण सगळे पुलंना लेखक म्हणूनच ओळखतो का ? .... .पुलंच लिखाण समृद्ध तर होतच पण ते वाचतांना जाणवतो तो त्यातला अप्रतिम निरीक्षण करू शकणारा माणूस .....मग ते खाद्य भ्रमंती असो किंवा पर्यटन .....एखाद्या गावातलं वर्णन असो , शहरातल असो किंवा परदेशातील ......निरीक्षण शक्ती अफाट आणि ते लिहिण्याची भाषा जेवढी समृद्ध तेवढीच मिश्किल सुद्धा .....त्यातल्या कोट्या असोत किंवा कोपरखळ्या ......कुणालाही न दुखवता विनोद कसा करावा ही खूप मोठी त्यांनी सर्वांना दिलेली एक शिकवण आहे........
विनोदी लिखाण जरी त्यांनी जास्त केलेलं असलं तरी त्यांनी जे 1970 च्या emergency मध्ये लिहिले ते काही लेख माझ्या वाचण्यात आले .....त्यावेळच्या सरकारला दिलेल्या कोपरखळ्या....त्यातली बोचणारी भाषा हे पण ते लिहू शकतात आणि ते पण इतक्या सक्षमपणे .....त्यावेळच्या सरकारला न घाबरता केलेलं ते लिखाण वाचून तर त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो ......
अजूनही मी लिहितेय ते लेखनाबद्दल .......कारण इतकं अफाट आणि अचाट करणार लेखन आहे की किती लिहावं तेवढं कमीच .....त्यात विविधताही तेवढीच .....असो .....तर असे हे पूल जेव्हा गुळाचा गणपती सारखे चित्रपट काढतात ....चित्रपटात भूमिका तर करतातच पण विविध चित्रपटांचे दिग्दर्शन करतात ...... गाण्यांना चाली देतात .......नाटककार सुद्धा होतात ........वक्तृत्वा चे कितीतरी सफल एकपात्री प्रयोग करतात ......हे सगळं करत असतांना त्या त्या प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन ती ती कला किती चांगल्या प्रकारे सफल होऊ शकेल या साठी प्रयत्न करतात ......विचार करा .....एखाद काम जर चांगलं करता येत असेल कुठल्याही व्यक्तीला ........तर ती व्यक्ती generally तेच काम आयुष्यभर करते ..........त्यात ते त्या व्यक्तीला आवडणारी कला असो अथवा कुठला व्यवसाय असो.....किंवा एखादा कलाकार ठराविक प्रकारच्या चित्रपटात काम करणं असो ......जी गोष्ट आपण यशस्वीरीत्या करू शकतो त्यात बदल करणं हे फारस कुणी करतांना दिसत नाही .......पण पुलंच्या आयुष्याचा जर आलेख पहिला तर जाणवतं की ........ ही व्यक्ती त्या त्या क्षेत्रात उंच पोहोचल्यावर ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन पण परत तेवढ्याच उंचीवर जाऊ शकते........... आणि ते सोडून परत तिसऱ्या क्षेत्रात परत तशीच उंची गाठू शकते .... .......मला तर ते पाहून खूपदा असा भास होतो ......टारझन जसा आपण चित्रपटात बघतो न .....एका झाडाची फांदी सोडून दुसऱ्या झाडाची फांदी पकडून त्या दुसऱ्या झाडावर जातो मग तिसऱ्या .....अशा अनेक झाडांवर लीलया जातो आणि परतीचा प्रवास पण तेवढ्याच लीलया करतो आणि नंतर जमिनीवर पण तेवढयाच सहजतेने आणि आत्मविश्वासाने चालतो......तस वाटत हे ......हो न ......एक वाक्य वाचलं होतं मागे मी ......एखाद काम कुणीही मनुष्य जर चांगलं यशस्वीरीत्या करू शकतो तर तो कुठलंही काम तेवढच चांगलं करू शकतो ....केवळ तेवढा प्रयत्न किंवा अभ्यास ती व्यक्ती लक्षपूर्वक करत नाही किंवा ते काम करायला तेवढा वेळ देत नाही ..... .....बरोबर न ..... आपल्याला सगळ्यांना वाटतं की मला हेच जमत बाबा.....ते कसं जमेल ?.....मला येणार नाही ......मी कधी केलंच नाही ते .....कसं करू .......जमेल का मला ............आणि हेच केवळ हेच विचार आपल्याला मागे खेचतात ......माणसाचा मेंदू म्हणतात फक्त 10 % च वापरतो प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात .....या लोकांना मात्र पाहिलं की प्रश्न पडतो आपण किती वापरत असू ?.........किती किती वेगवेगळी काम करत गेले असे लोक ..........पूल जेव्हा बंगाली शिकण्यासाठी शांतिनिकेतन मध्ये राहिले ते लिखाण वाचतांना त्यावेळचे त्यांचे अनुभव , त्यांची त्या वयातली निरीक्षण शक्ती अचंबित करते .. .
खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हा शब्द पण अपुरा वाटतो अशा व्यक्तींबद्दल लिहितांना ...... आयुष्य पूर्ण जगणं म्हणतात ते कदाचित यालाच .......त्यांना शेवटी शेवटी बरं नसतांना घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटल होत की सकाळी उठल्यावर मला हात पाय हलवता येतात....मला दिसतंय ,बोलता येतंय न .....मग आजचा दिवस माझा .....ज्यादिवशी झोपेतून उठल्यावर यापैकी मला एकही काम करता येणार नाही त्यादिवशी मीच राहणार नाही तर मग विचार का करायचा ......प्रत्येक दिवस नवा .....उठल्यावर आज काय करु असा विचार करण्यापेक्षा.... मी काय काय करू आज .....दिवस तर सुरू झाला .........चला ....वा असे विचार ते व्हील चेअर वर होते तेव्हाचे ........तर मग जेव्हा ते सगळं लेखन , वाचन , नाटक , गाणी करू शकत होते त्यावेळी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी तर ते नक्कीच उत्साह आणि चैतन्याचा झरा असावेत ......
मला दिसलेले , भावलेले आणि उमगलेले असे हे पुल ......पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे .........एक आवडतं अष्टपैलू व्यक्तिमत्व .
#अष्टपैलूव्यक्तिमत्त्व , #गुळाचागणपती , #बटाट्याचीचाळ , #शांतिनिकेतन, #पुरुषोत्तमलक्ष्मणदेशपांडे , #पुलदेशपांडे
really allrounder
ReplyDeleteखूप छान...खरोखर चैतन्याचा झरा...मस्त लिहिलंस मनी
ReplyDeleteरेणू
Apratim!!!majhe sarvat awadte lekhak.👌👍👏👏
ReplyDeleteWell written, Gem of a prson Pu La. Baba had bought his peti tape. He was a good peti player.
ReplyDeleteWell explained Pu La
ReplyDeleteमस्त लिहिलंय...
ReplyDeletewell written .
ReplyDeleteबढीया...
ReplyDeleteसर्वांचे मनपुर्वक आभार
ReplyDeleteKharach aahe te ashtapailu he pan kamich aahe tyanchyasathi,saglyanna aavdanare aahet te ani lok ajunahi tyanche pustaka vachtat ani je vachtat te nakkich tyanchya shabdanchya premat padtat,mi vachlela pahila pustak sudha tyanchech hote ,ani majhe saglyat aavdte lekhak aahet te
ReplyDeleteSurekh likhan n PU.L chi personally pan
ReplyDeleteछानच लिहिलय ! पु ल म्हणजे खरच जबरदस्त रसायन. त्यांच्या खुप गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. यमी पेक्षा सहापट गोरी किंवा वाळत घातलेले chips जास्त चटकदार लागणे वगैरे .
ReplyDelete👌👌👌पु.ल. एक अद्भूत रसायन!!
ReplyDeleteपु.ल.एक अष्टपैलू व्यक्तीमत्व......खुपच सुंदर लिखाण......👌👌
ReplyDeleteसर्वांचे आभार🙏
ReplyDelete